नवी दिल्ली – इंडिया आघाडीतील घटक पक्षांना एकत्र ठेवण्यासाठी आणि भाजपला पराभूत करण्याच्या रणनीतीचा एक भाग म्हणून या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने जाणीवपूर्वक कमी जागा लढवल्या आहेत, असे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी म्हटले आहे.
पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की, संघटित विरोधी पक्षांचा विजय सुनिश्चित करण्यासाठी ही तडजोड केली गेली होती आणि त्यातून इतर पक्षांना जादा जागा दिल्या गेल्या आहेत असे ते म्हणाले.
खर्गे यांनी प्रियंका गांधी यांना पक्षाची संपत्ती आणि स्टार प्रचारक म्हणूनही संबोधले. प्रियंकांनी निवडणूक न लढवण्याच्या त्यांच्या निर्णयाचेही खर्गे यांनी समर्थन केले. वायनाड आणि रायबरेली दोन्ही जिंकल्यास राहुल गांधींनी कोणती जागा सोडावी, असे विचारले असता खर्गे म्हणाले की, ही त्यांची वैयक्तिक निवड आहे.
इतर समविचारी पक्षांशी सल्लामसलत करून काँग्रेसने प्रत्येक राज्यात युती करण्यासाठी समिती स्थापन केली होती असे खर्गे म्हणाले. पक्षाच्या हायकमांडने या रणनीतीला मान्यता दिली. आम्ही प्रत्येक राज्यात सल्लामसलत करून जागा निश्चीत केल्या आहेत.
काँग्रेस या निवडणुकीत ३२८ जागा लढवत आहे, जी आतापर्यंतची सर्वात कमी संख्या आहे, आणि इंडिया आघाडीतील इतर विरोधी पक्षांसाठी २०० पेक्षा जास्त जागा सोडल्या आहेत असे ते म्हणाले.
केरळ, बंगाल आणि पंजाबसारख्या राज्यांमध्ये इंडिया आघाडीचे पक्ष आपसातच लढत आहेत त्या विषयी विचारले असता ते म्हणाले की, असे असले तरी केंद्र सरकारच्या विरोधात एकत्र येण्याबाबत त्यांच्यात कोणतेही मतभेद नाहीत.
या राज्यांमध्ये, आम्ही आपसातच लढत आहोत कारण काही राज्यांमध्ये इंडिया आघाडीतील दोन्ही पक्ष महत्त्वाचे आहेत, अन्यथा त्याचा भाजपला फायदा होईल असे ते म्हणाले. परंतु आम्ही सर्वजण भाजप आणि मोदीजींच्या विचारसरणीच्या विरोधात लढत आहोत असेही त्यांनी स्पष्ट केले.
सर्वच पक्षांनी एक विचारपूर्वक मार्ग काढला आहे जो देशाच्या हिताचा आहे,असे ते ठामपणे म्हणाले. राहुल गांधी, अखिलेश यादव आणि अरविंद केजरीवाल यांसारखे विरोधी नेते एनडीए किती जागा जिंकणार या बाबत वेगवेगळे अंदाज व्यक्त करीत आहेत, या प्रश्नावर ते म्हणाले, प्रत्येक नेत्याचे आकलन वेगळे असते.
कर्नाटकमध्ये मी योग्य मूल्यांकन करू शकतो कारण मला राज्य चांगले माहित आहे. असेच त्यांचेही मूल्यांकन वेगवेगळे असू शकते. पण भाजपला सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी जे संख्याबळ आवश्यक आहे, ते संख्याबळ आमच्याकडे इंडिया आघाडीकडे आहे.
निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षनेत्यांना तुरुंगात का टाकले जात आहे, असा सवालही त्यांनी केला. गेली १० वर्षे सत्तेत असताना त्यांना अटक का केली नाही? पण आता निवडणुका सुरू आहेत म्हणून त्यांना तुरूंगात टाकले जात आहे, इथे नेत्यांना धमकावले जात आहे, त्रास दिला जात आहे आणि त्यांना प्रचारासाठीही सोडले जात नाही.
विरोधी पक्षनेत्यांना धमक्या दिल्या जात असल्याने भाजपकडून कोणतेही खेळाचे समतल क्षेत्र राखले जात नाही. या गोष्टी लोकशाहीसाठी चांगल्या नाहीत आणि हुकूमशाही राजवट सुरू आहे असे खर्गे म्हणाले.
त्यांनी पक्षाच्या अनेक दिग्गजांनी स्वत:ला लढण्यापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे समर्थन केले, काही जणांनी विधानसभा निवडणूक लढवली होती आणि त्यांच्या जागी आपलेच लोक उभे करण्याची त्यांची रणनीती आहे असे त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.