नवी दिल्ली – भारतीय नौदलाने राष्ट्रीय सागरी हद्दीचे रक्षण करण्यासाठी सदैव लढाईसाठी सज्ज राहणे आवश्यक आहे, असे नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश के त्रिपाठी यांनी म्हटले आहे. हिंदी महासागरात चीनचे वाढते आक्रमण आणि लाल समुद्रातील अस्थिर परिस्थिती या पाश्र्वभूमीवर त्यांनी दिलेला हा इशारा महत्वाचा मानला जात आहे.
येथील नौदल मुख्यालयात नियुक्त अधिकाऱ्यांना संबोधित करताना, त्यांनी धोरणात्मक जलक्षेत्रातील सध्याच्या सुरक्षेचे वातावरण आणि त्यामुळे नौदलापुढे निर्माण झालेल्या आव्हानांचा उल्लेख केला. त्यांनी यावर भर दिला की भारताच्या सागरी सामर्थ्याचे प्राथमिक प्रकटीकरण म्हणून, भारतीय नौदलाने राष्ट्रीय सागरी हितांचे कधीही, कुठेही, कसेही रक्षण करण्यासाठी सदैव लढाईसाठी तयार राहणे आवश्यक आहे.
ॲडमिरल त्रिपाठी यांनी नौदलाला सागरी क्षेत्रातील विद्यमान आव्हानांना तोंड देण्यासाठी इन-हाऊस उपाय शोधणे, नवकल्पना राबवणष आणि आधुनिक तंत्रज्ञानच स्वीकार करणे यावर भर दिला.नौदल कर्मचाऱ्यांनी आपल्या सेवेद्वारे सर्व अनिवार्य कार्ये पूर्ण करताना जवानांनी दाखवलेल्या समर्पण आणि व्यावसायिकतेची ॲडमिरलने प्रशंसा केली.
गेल्या काही महिन्यांत, भारतीय नौदलाने अनेक मालवाहू जहाजांना तांबड्या समुद्रात संरक्षण देऊन त्यांना मदत दिली आहे. गाझामधील लष्करी आक्रमण थांबवण्यासाठी आणि इस्रायलवर दबाव निर्माण करण्यासाठी हुथी अतिरेकी लाल समुद्रातील व्यापारी जहाजांना लक्ष्य करत आहेत.त्या जहाजांना भारतीय नौदलाने संरक्षण दिले आहे.