मुंबई : देशातील विविध योजनांना नरेंद्र मोदी यांचे नाव देण्यात आले आहे. तसेच नरेंद्र मोदी यांचे नाव स्टेडियमलाही देण्यात आलं आहे. त्यावरून आता काँग्रेस आक्रमक झाल्याचं दिसतं आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी याबाबत ट्विट करत भाजपाची वाटचाल ही राजेशाहीकडे चालली आहे असा गंभीर आरोप केला आहे.
नरेंद्र मोदी हे देश हुकूमशाहीच्या दिशेने नेत आहेत असे विरोधक का/bjpयमच म्हणतात त्यानंतर आता सचिन सावंत यांनी भाजपावर देश राजेशाहीच्या दिशेने जात असल्याचाही आरोप केला आहे.
१/२ घराणेशाहीच्या नावाने बोंब ठोकत देश हळूहळू ‘राजेशाही’कडे नेण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. लांगूलचालनाची भाजपाशासित राज्य सरकारांची चढाओढ लागली आहे. गुजरात, कर्नाटकमध्ये मोदींच्या नावाने योजना आल्या, स्टेडियम झाले. आता महाराष्ट्र सरकारनेही हयातीतच मोदींचे नाव योजनांना दिले आहे. pic.twitter.com/LwvKIg2yVt
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) March 9, 2023
सचिन सावंत यांनी केलेल्या ट्विटमध्ये, “घराणेशाहीच्या नावाने बोंब ठोकत देश हळूहळू राजेशाहीकडे नेण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. लांगूलचालनाची भाजपाशासित राज्य सरकारांमध्ये चढाओढ लागली आहे. गुजरात, कर्नाटकमध्ये मोदींच्या नावाने योजना आल्या, स्टेडियम आलं. आता महाराष्ट्र सरकारनेही हयातीतच मोदींचे नाव योजनांना दिले आहे. आधी इराक, उत्तर कोरिया, रशियासारख्या काही देशात हे दिसलं होतं आता लवकरच सर्वत्र भारतात दिसेल”,असे म्हटले आहे.
सचिन सावंत यांनी अर्थसंकल्पातल्या योजनांची नावे ट्विट केली आहेत. ज्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी असा उल्लेख आहे. तसंच मोदी आवास घरकुल योजना असाही उल्लेख आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. त्यामधल्या तरतुदींची नावं ट्विट करत सचिन सावंत यांनी आपला देश हा राजेशाहीकडे नेण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे असा आरोप केला आहे.