मुंबई – बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकरची पूजा करण्यासाठी शिव भक्त तेथे जाऊन दर्शन घेतात आणि ते महाराष्ट्रातील पुणे शहरात वसलेले आहे. या शिव लिंगाची पूजा भाविकांकडून केली जाते. मात्र भीमाशंकर महाराष्ट्रात असताना आसाममधील लोक प्रश्न उपस्थित करतात. महाराष्ट्रात वसलेले भीमाशंकर हे खरे ज्योतिर्लिंग नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे शिवभक्तांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. तसेच भीमाशंकराचे सहावे ज्योतिर्लिग पुण्यात नाही तर आसाममध्ये आहे असा अजब दावा आसाम सरकारने मुंबईतल्या वृत्तपत्रातील जाहिरातीद्धारे केला आहे. त्यामुळे शिवभक्तांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे.
ज्योतिर्लिंगांच्या अधिकृत माहितीसाठी शिवपुराण घेतले आहे. आसाममधील गुवाहाटी येथील लोकांचा असा विश्वास आहे की, भीमाशंकर हे महाराष्ट्रात नसून गुवाहाटीच्या टेकड्यांमध्ये आहे. आसामच्या श्री शंकरदेवांच्या वैष्णव भक्तीच्या वादळामुळे येथे शिवभक्तीचा वेग कमी झाला असे त्यांचे मत आहे. त्यामुळेच भीमाशंकर ज्योतिर्लिंग गेली काही शतके विस्मृतीच्या अंधारात हरवून गेले.
आसाम सरकारची वादग्रस्त जाहीरात
आसाम सरकारने एक जाहीरात प्रसिद्ध केली आहे. 6वं ज्योतिर्लिंग आसाममध्ये आहे अशी जाहिरात आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी केलीय. या जाहीरातीवरुन आता नवा वाद निर्माण झाला आहे.