Atishi Singh : दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या बड्या नेत्यांच्या ठिकाणांवर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) छापे टाकल्याची माहिती समोर आली आहे. त्यासोबतच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे स्वीय सचिव बिभव कुमार आणि राज्यसभा खासदार एनडी गुप्ता यांच्या घरावर ईडीने छापेमारी केली आहे. याच छापेमारीच्या पार्श्वभूमीवर आप सरकारमधील मंत्री आताशी सिंह यांनी ईडीवरच आरोप करत काही सवाल उपस्थित केले आहेत.
आम आदमी पक्षाच्या दिल्ली सरकारमधील मंत्री आतिशी सिंह यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेऊन अंमलबजावणी संचालनालयाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. यावेळी बोलताना आतिशी यांनी,”ईडीने दीड वर्षात तपासाच्या नावाखाली घोटाळा केला आहे. त्यांनी बंद खोलीत आरोपींचे जबाब नोंदवून न्यायालयात स्वतंत्र जबाब नोंदविला. एवढेच नाही तर बंद खोलीतील सीसीटीव्ही फुटेजचा ऑडिओही डिलीट करण्यात आला आहे. दीड वर्षात ईडीला ना कोणतीही वसुली करता आली, ना पुरावे गोळा करता आले, ना त्यांच्याकडे जबाब नोंदवता आले, असा दावा अतिशी यांनी केला आहे.
पुढे बोलताना आतिशी यांनी, भाजप केंद्रीय एजन्सीच्या मदतीने आमच्या पक्षाला घाबरवण्याचा आणि धमकावण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, ‘आप’ धमक्यांना भिख घालत नाही. आमच्या नेत्यांना दोन वर्षांपासून धमक्या दिल्या जात आहेत. कथित दारू घोटाळ्याच्या नावाखाली छापे टाकून समन्स पाठवले जात आहेत. मात्र अजूनपर्यंत ईडीच्या हाताला काहीही लागले नाही.असे त्यांनी म्हटले आहे.
किसी भी ED के केस को साबित करने के लिए 3 तरह के साक्ष्य होते हैं:
1. पैसे की रिकवरी
2. कोई पुख़्ता सुबूत
3. गवाही (Statements)2 साल की जाँच में अभी तक 1 रुपए की रिकवरी नहीं हुई है, ED को एक भी पुख़्ता सुबूत नहीं मिला है। उनका सारा केस सिर्फ़ और सिर्फ़ statements पर टिका है, और… https://t.co/Hx1ms7RPXK
— Atishi (@AtishiAAP) February 6, 2024
दरम्यान, ईडीच्या या कारवाईवर एक ट्विट पोस्ट करत “तपासात तीन गोष्टी महत्त्वाच्या असतात. पहिली गोष्ट – पुनर्प्राप्ती आवश्यक आहे. शेकडो छापे टाकूनही एक रुपयाही वसूल झालेला नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुरावा. दोन वर्षांत कोणताही पुरावा सापडला नाही. असेही न्यायालयाने म्हटले आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट – साक्षीदार आहेत. ईडीने ज्यांची चौकशी केली त्यांची सर्व विधाने खोटी आहेत. विधान खोटे ठरले आहे.” असे म्हटले आहे. तसेच साक्षीदाराला देखील धमकावण्यात येत असल्याचाही आरोप यावेळी त्यांनी केला.
पुढे आतिशी म्हणाले की, कोणत्याही तपास यंत्रणेला कॅमेऱ्यासमोर त्यांची चौकशी करावी लागते. कोणतेही ऑडिओ आणि व्हिडिओ फुटेज नसल्यास, कोणत्याही साक्षीदाराला धमकावले किंवा धमकावल्याचा कोणताही पुरावा मिळणार नाही. किंवा साक्षीदाराने लिहिलेले जबाब तेच आहे की बदलले आहे? असा सवाल यावेळी त्यांनी उपस्थित केला.
तसेच जेव्हा एका आरोपीने काही दिवसांपूर्वी न्यायालयात अर्ज केला आणि सांगितले की, मला चौकशीचे सीसीटीव्ही फुटेज हवे आहे. सरकारी साक्षीने तो समोरासमोर आला. या संपूर्ण चौकशी प्रक्रियेदरम्यान खोलीत सीसीटीव्ही लावण्यात आले होते. न्यायालयात निवेदन सादर केले असता वेगळेच म्हणणे होते. ईडीने त्या चौकशीचे फुटेज दिल्यानंतर त्याचा ऑडिओ डिलीट करण्यात आला. ईडीने बंद खोलीचे सर्व पुरावे हटवले. त्यामुळे तुम्ही ते ऑडिओ का डिलीट केले असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.