Ashok Chavan । माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सोमवारी काँग्रेस सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. राजीनामा दिल्यानंतर अशोक चव्हाण आज अधिकृतरित्या भाजपमध्ये प्रवेश केला. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित आज पक्षप्रवेश केला.
या प्रवेशापूर्वी माध्यमांशी बोलतांना अशोक चव्हाण यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली आहे. यावेळी त्यांनी नाना पटोलेंवर निशाणा साधला. यादरम्यान, पत्रकारांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबाबत एक प्रश्न विचारल्यावर अशोक चव्हाणांनी दिलेल्या उत्तराची चर्चा सुरू झाली आहे .राहुल गांधी किंवा अन्य नेत्यांनी तुमच्याशी संपर्क केला का? असा प्रश्न प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधीनं विचारला. त्यावर अशोक चव्हाण म्हणाले, “अब छोडीये… चॅप्टर इज ओव्हर… नई शुरूवात है…” असं म्हणत त्यांनी उत्तर देण्यास टाळाटाळ केली.
दरम्यान, भाजप पक्षासाठी अशोक चव्हाण यांचा पक्ष प्रवेश महत्वाचा ठरणार आहे. राज्यभेत अशोक चव्हाण यांना भाजपने उमेदवारी दिली तर यामुळे काँग्रेसची मते फोडली जाऊ शकणार, त्यांच्या पक्ष प्रवेशाचा भाजपला मतदारांचा आकडा वाढवण्यात मदत होणार आहे. यापूर्वी, भाजप पक्षाने विधानपरिषद आणि राज्यसभा निवडणुकीत हा प्रयोग केला होताएक ज्येष्ठ आणि अनुभवी नेता अशोक चव्हाण यांच्या पक्ष प्रवेशामुळे भाजपची मराठवाड्यात ताकद वाढेल.
तसेच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण यांचा सारखा दिग्गज नेता गळाला लागला, तर काँग्रेसमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण करून आणखी आमदार काँग्रेसचे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फोडले जाऊ शकतात.