Farmers Protest in Delhi। शेतकऱ्यांचा दिल्लीकडे जाणारा मोर्चा रोखण्यासाठी केंद्र सरकार आणि शेतकरी नेत्यांमधील बैठक निष्फळ ठरली. काल रात्री झालेल्या मॅरेथॉन बैठकीत पिकांच्या किमान आधारभूत किमतीचा (एमएसपी) हमीभावाचा मुद्दा अडकला. त्यामुळे दिल्लीला लागून असलेल्या सर्व सीमा सील करण्यात आल्या आहेत. दरम्यान, आता दिल्लीच्या सीमेवर परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे.
पोलिसांनी आंदोलकांवर अश्रुधुराचे नळकांडे फोडले Farmers Protest in Delhi।
पंजाब-हरियाणातील शेतकरी आपल्या विविध मागण्यांसाठी दिल्लीकडे रवाना झाले आहेत. त्या अगोदर शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यात तब्बल ५ तास चाललेली चर्चा निष्फळ ठरली. त्यानंतर आज शेतकरी दिल्लीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलेत. त्यामुळे सीमेवरील परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे दिसतायत. तर दुसरीकडे पोलिसांनी शेतकरी आंदोलकांवर अश्रुधुराचे नळकांडे फोडले.
#WATCH | Police use tear gas drones at the Haryana-Punjab Shambhu border to disperse protesting farmers. pic.twitter.com/LcyGpDuFbv
— ANI (@ANI) February 13, 2024
हेही वाचा
पहिल्या शेतकरी आंदोलनाच्या तुलनेत यंदाचे आंदोलन वेगळे ; निवडणुकीच्या तोंडावर का केलं जातंय आंदोलन ?
दिल्लीकडे कूच करणाऱ्या शेतकऱ्यांवर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. सीमेवर शेतकऱ्यांना रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत, मात्र शंभू सीमेवर परिस्थिती बिकट होत आहे. याठिकाणी अधूनमधून अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या जातायत. शेतकऱ्यांना सुमारे 300 मीटर मागे ढकलण्यात आले आहे, मात्र आंदोलक अजूनही दिल्लीत प्रवेश करण्यावर ठाम असल्याचं म्हटलं जातंय.
#WATCH | Police fire tear gas to disperse protesting farmers at Punjab-Haryana Shambhu border. pic.twitter.com/LNpKPqdTR4
— ANI (@ANI) February 13, 2024
दिल्लीत ट्रॅक्टर-ट्रॉलीला परवानगी नाही
शेतकऱ्यांच्या दिल्लीकडे मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सर्व सुरक्षा व्यवस्था करण्यात आल्यात. या पार्श्वभूमीवरपोलिसांनी, शहरात कलम 144 लागू केलंय. तसेच शहरात ट्रॅक्टर ट्रॉलीला परवानगी नाही. सोशल मीडियावरही लक्ष ठेवले जात आहे. सुरक्षेसाठी ड्रोन हे प्रभावी साधन आहे, आम्ही त्याचा वापर करू. असे म्हटले.
ड्रोनद्वारे अश्रुधुराच्या नळकांड्या Farmers Protest in Delhi।
शंभू सीमेवर पोलीस आंदोलकांवर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडत आहेत. शेतकरी दिल्लीकडे कूच करण्यासाठी ठाम आहेत. यासाठी ड्रोनद्वारे पोलिस सतत अश्रुधुराच्या नळकांड्या फोडतायत. जेणेकरून फतेहगढ साहिबकडून पुढे जाणाऱ्या ट्रॅक्टरना पुढे जाण्यापासून रोखले जाईल.