मुंबई – हिवाळी अधिवेशनामध्ये विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप झाल्याचे पाहायला मिळाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही काल अनेक प्रश्नांना उत्तरे देत जोरदार फटकेबाजी केली. यावरून आता भाजपचे खासदार निलेश राणे यांनी अजित पवारांवर टीका केली आहे.
निलेश राणे म्हणाले कि, ३ पक्षाचे सरकार आले आणि हातातोंडाचा घास गेल्याने दुःख झालंय असं अजित पवार बोलले. अजित पवार साहेब तुम्ही पत्रकार परिषदेत रडता, मोबाईल बंद करून लपून बसता, बिनखात्याचे ३ महिने मंत्री राहण्याचा मान तुमचाच. तुम्ही इतके दुःखात होतात की राजकारण सोडून शेती करणार होतात त्याचे काय झाले? असा प्रश्नदेखील त्यांनी अजित पवारांना विचारला आहे.
३ पक्षाचे सरकार आले आणि हाता तोंडाचा घास गेल्याने दुःख झालंय असं आज अजित पवार बोलले. अजित पवार साहेब तुम्ही PC मध्ये रडता, मोबाईल बंद करून लपून बसता, बिन खात्याचे ३ महिने मंत्री राहण्याचा मान तुमचाच. तुम्ही इतके दुःखात होतात की राजकारण सोडून शेती करणार होतात त्याचं काय झालं??
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) December 15, 2020
तसेच, अनेक आमदार महाविकास आघाडीत येणार असल्याचा गौप्यस्फोटही अजित पवारांनी केला होता. यावरही निलेश राणे यांनी निशाणा साधला आहे. कोणाला घ्यावा कोणाला न घ्यावा हा तुमचा प्रश्न आहे पण इतक्या पल्ट्या मारून सुद्धा मान वर करून फिरणाऱ्याला मराठा मी मानत नाही. गप्प बसून ५ वर्षे उपमुख्यमंत्रीपद भोगलं असतं तर काय वाटलं नसतं पण इतक्या अभिमानाने हा माणूस कसा वागू शकतो?? असे त्यांनी म्हंटले आहे.