भाष्य,पुणे, दि. 8 (राहुल गणगे) -पारगाव (ता. दौंड) येथे आयोजित एका कार्यक्रमात विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या भाषणाला सुरुवात झाली. दरम्यान त्यांच्याकडे विविध मागण्यांबाबत अनेकांची निवेदने आली. दरम्यान ते म्हणाले, मी तर सर्वांचीच कामे करत आलो आहे आणि करतोहीआहे. पण अख्ख्या पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीला यश आलेआले. फक्त दौंडचाच माझा आमदार तुम्ही पाडला?अशी खंत त्यांनी व्यक्त केली मात्र झाले भलतेच,समोरील पारगावकर मंडळींनी शांत बसण्याऐवजी टाळ्यांचा कडकडाट केला आणि अजितदादाही थोडावेळ बुचकळ्यात पडले. त्यामुळे त्यांनी शेवटी स्वतःच्याच कपाळावर मारून घेतला.
माजी उपमुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते अजित पवार हे आपल्या भाषणाच्या खास शैलीने परिचित आहेत. सडेतोड बोल, स्पष्टवक्तेपणा पण तितक्याच परीने कार्यकर्ता चुकला तर त्याला त्याची चूक जाग्यावरच दाखविण्याची शैली ही फक्तअजितदादांकडेच आहे. पारगाव येथील शेतकरी मेळाव्यातही त्यांची ही खुबी सर्वांनाच वरील प्रसंगातून दिसून आली. भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यावर टिका करताना त्यांनी आणखी भरपूरबोलावे, खास शैलीत टिका करावी अशी इच्छा येथीलउपस्थितांची होती परंतु त्यांनी भीमा पाटसकारखाना हा चालकांच्या नाकर्तेपणामुळे अखेरच्या घटका मोजत आहे. याला सर्व संचालक मंडळ जबाबदारअसल्याचे सांगितले. आणि शेजारी सुरु असणाऱ्या तिन्हीखासगी कारखान्यांची सद्य परिस्थिती कथन करतत्यांच्या कामाची स्तुती केली. परंतु शिवाय दौंड शुगर हाखासगी कारखाना लवकरच सात हजाराहून थेट सतराहजार गाळप क्षमतेचा होणार असल्याचे सांगताचकार्यकर्तेही बुचकळ्यात पडले. कारण इच्छा होती खासगी कारखान्यांवर टिकेची आणि भीमा पाटस कारखान्यावरून आमदार राहुल कुल यांनाघेरण्याची मात्र येथे वेगळेच होत असताना दिसल्यानेनेमक्या टाळ्या कुठे वाजवायच्या आणि कुठे थांबायचे हेमात्र कार्यकर्त्यांना उमजलेच नाही. यावेळी वर वर पुढारीपणा करून चालणार नाही, त्यासाठी गावही सोबत असायला पाहिजे. असेही यावेळी त्यांनी कार्यकर्ते अन् गावनेत्यांना सुनावले. भीमा पाटस कारखाना परराज्यातील मोठ्या कारखानदाराला चालवायला देण्याबाबत महाविकास आघाडी सरकारच्या काळात चर्चेला उधाण आले होते. कर्जाच्या ओझ्याखाली दबून बंद पडलेल्या भीमा – पाटस कारखाना पुन्हा सुरू होण्याची आशा सभासदांसह तालुक्यातील जनतेला लागली होती. परंतु दरवेळी निवडणुका आल्या की आश्वासनांचीच मुक्ताफळे मिळत आहेत. परंतु भीमा पाटस कारखान्याबाबत कोणीही ठोस निर्णय घेत नसल्याने तालुक्याचे लक्ष कारखान्याचे धुराडे कधी पेटणार? याकडे लागले आहे.
कोणाचा वरचष्मा होणार?
काही लोक राष्ट्रवादीची फक्त पदे भोगतात, नंतर पदे गेल्यावर गायब होतात, हे योग्य नाही. अशीही खंत यावेळी माजी आमदारांनी व्यक्त केली. आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती, मार्केट कमिटी निवडणुका बहुमताने जिंकल्या जातील यामध्ये शंका नाही. त्यामुळे दौंड तालुक्यात राष्ट्रवादी पक्षाने जोमाने तयारी करण्याची गरज आहे. परंतु दौंड तालुक्यात भाजपचे मोठे वलय आहे. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांत कोणाचा वरचष्मा होणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.