पारनेर – शेतकऱ्यांना शेती तंत्रज्ञानाविषयी माहिती व्हावी, या उद्देशाने आयोजित केलेले कृषी प्रदर्शन महत्त्वपूर्ण ठरणार आहे.त्यामुळे आगामी काळातही असे उपक्रम राबवावेत, असा लिखित संदेश कृषी गंगा प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिला.
कृषी गंगा या चार दिवसीय प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके होते. यावेळी फाळके म्हणाले, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी सर्वसामान्य कौटुंबिक पार्श्वभूमी लाभलेल्या नीलेश लंके यांच्या रूपाने संधी दिली आहे. त्यामुळे समाजाच्या हितासाठी पवार तरुणांसारखे काम करत आहेत. त्यामुळे त्यांचे मार्गदर्शन नक्कीच महत्त्वाचे ठरणार आहे. आमदार नीलेश लंके म्हणाले, मी भाग्यवान आहे की अण्णा हजारे यांच्या मतदारसंघाचे राज्यात प्रतिनिधित्व करण्याची संधी मला मिळाली.
हजारे यांच्या लौकिकाला शोभेल असे, काम करणार आहे. यावेळी बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड, तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे, उपसभापती सुनंदा धुरपते, महिला सरचिटणीस सुवर्णा धाडगे, सुदाम पवार, दीपक पवार, सुरेश धुरपते, मारुती रेपाळे, सरपंच राहुल झावरे, विक्रम कळमकर, सरपंच ठकाराम लंके, सरपंच अशोक घुले, दादा शिंदे, नाना रोहकले, डॉ. बाळासाहेब कावरे, निवृत्ती गाडगे, जयसिंग मापारी, दत्ता आवारी, सरपंच किसन रासकर, कारभारी पोटघन, बापू शिर्के, मेजर विजय औटी, बबलू रोहकले, संजय मते, श्रीकांत चौरे उपस्थित होते.
खवय्यांनी मारला खाद्यपदार्थांवर ताव
खवय्येगिरीमध्ये कोल्हापूरची स्पेशल भेळ, पाणीपुरी, कचोरी, दावणगिरी लोणी डोसा, दिल्ली चाट, स्पेशल कोल्हापूर चायनीज, शिपी आमटी, बटर पावभाजी, शेगाव कचोरी, थालीपीठ अशा व्हेज, नॉनव्हेज विविध पदार्थांवर पहिल्याच दिवशी खवय्यांनी ताव मारला.