करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सरकारचा निर्णय
पुणे – केंद्रीय अर्थ मंत्रालयाने 5 लाख रुपयापर्यंतचा कर परतावा तातडीने देण्याच्या सूचना कर विभागाला केल्या आहेत. याचा फायदा 14 लाख करदात्यांना होईल. त्याचबरोबर जीएसटी आणि सीमा शुल्क करदात्यांचा परतावा देण्याच्याही सूचना दिल्या गेल्या आहेत. याचा 1 लाख व्यावसायिक आणि छोट्या उद्योगांना लाभ होईल.
कर विभाग यासाठी 18 हजार कोटी रुपयाचे वितरण करणार आहे. कर विवरण भरल्यानंतर ई- पडताळणी केली जाते. परतावा मिळण्यास दोन ते तीन महिन्यांचा कालावधी सर्वसाधारण परिस्थितीत लागतो. मात्र, सध्याच्या परिस्थितीत व्यापारी आणि व्यावसायिकांना त्रास होऊ नये, याकरिता हा निर्णय घेण्यात आला आहे. प्राप्तिकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार 1 मार्च 2019 पासूनचा परतावा फक्त पॅन कार्ड जोडलेल्या खात्यात जमा होणार आहे.
In context of COVID-19 situation & to grant immediate relief to taxpayers, GOI has decided to issue all pending income-tax refunds upto Rs.5 lakh & GST/Custom refunds with immediate effect.@nsitharaman @nsitharamanoffc @Anurag_Office @FinMinIndia @PIB_India @cbic_india #StaySafe pic.twitter.com/sF0cU8WyA1
— Income Tax India (@IncomeTaxIndia) April 8, 2020