नवी दिल्ली – विधानसभा निवडणुकीनंतर कुठलाही पक्ष सरकार स्थापन करू शकत नसल्यानं महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या दबावामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असा आरोप केला आहे.
राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर दिग्विजय सिंह यांनी म्हटले की,”महाराष्ट्राच्या राज्यपालांनी सत्तास्थापनेसाठी योग्य प्रक्रिया सुरू केली होती. त्यांनी सर्वप्रथम सर्वात मोठा पक्ष भाजपाला सत्तास्थापनेसाठी पाचारण केले. त्यानंतर दुसऱ्या सर्वात मोठ्या पक्षाला बोलावण्यात आलं. मात्र, त्या पक्षाकडेही बहुमताचा आकडा नसल्याने तिसऱ्या क्रमांकाच्या पक्षाला आमंत्रित करण्यात आलं.
‘या पक्षाला साडे आठ वाजेपर्यंत वेळ देण्यात आली होती. मात्र त्याआधी दुपारीच राज्यपालांनी केंद्र सरकारकडे राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली. यामागे नेमकं काय कारण आहे?’ असाही खोचक प्रश्न दिग्विजय सिंह यांनी सरकारला विचारला आहे.
#WATCH Digvijaya Singh, Congress: …This decision (President’s Rule in Maharashtra) has been taken under pressure from Prime Minister and Home Minister, we object to this. pic.twitter.com/GRaEoTPG5P
— ANI UP (@ANINewsUP) November 12, 2019