मुंबई : विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या उमेदवारांनी भरघोस मताधिक्क्यांनी विजय मिळवला. शिवसेनेच्या या विजयी उमेदवारांनी निकालानंतर जल्लोष केला.
आज शिवसेनेचे सर्व विजयी आमदार दुपारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. या भेटी दरम्यान शिवसेनेचाच मुख्यमंत्री करावा अशी मागणी ते उद्धव ठाकरे यांच्याकडे करणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.
विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप-शिवसेना युतीने सर्वाधिक जागांवर विजय मिळवला. निकाल जाहीर झाल्यानंतर दोन्ही पक्षांच्या नेत्यांसह पदाधिकारी आणि विजयी आमदारांनी एकच जल्लोष केला.
सरकार महायुतीचेच स्थापन होणार असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी निकालानंतर जाहीर केले. मात्र मुख्यमंत्री कोणाचा होणार यावरुन आता दोन्ही पक्षांमध्ये छुपेयुध्द सुरु आहे.