मुंबई: कर्जमाफीवरून काँग्रेसने पुन्हा एकदा भाजपवर टीका केली आहे. भाजप सरकारने ८९ लाख शेतकऱ्यांना ३४ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी देण्याची घोषणा केली होती. मात्र हि घोषणा फ्लॉप ठरली असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर त्यांनी याबाबत पोस्ट केली आहे.
“८९ लाख शेतकऱ्यांना ३४ हजार कोटी रुपयांची देशातील सर्वात मोठी कर्जमाफी हा भाजप सरकारचा दावा सपशेल खोटा ठरला असून २७ महिने उलटूनही ५० टक्के शेतकरी आजही कर्जमाफी पासून वंचित आहेत. भाजप सरकारची कर्जमाफी योजना पूर्णपणे फ्लॉप ठरली आहे!”असे काँग्रेसने म्हटले आहे.
विरोधकांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपला घेरले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस- कँग्रेसने जाहीर सभांमधून भाजपाला कर्जमाफी संदर्भात प्रश्न केले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी सरसकट कर्जमाफीचे शेतकऱ्यांना आश्वासन दिले होते.