मुंबई: “सीसीडी चे सर्वेसर्वा व्ही.जी. सिद्धार्थ यांच्या आत्महत्येचे वृत वेदनादायक आहे. सिद्धार्थ यांनी स्वदेशात मोठा उभारला. ३० हजार रोजगार उपलब्ध करून दिले. देशातील तरुण उद्योजकांनी आत्महत्या करणे दुर्दैवी आहे. सरकारच्या धोरणाला काय म्हणावे मेड इन इंडिया की डेड इन इंडिया?” असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला आहे.
व्ही. जी. सिद्धार्थ यांचा मृत्यू झाला आहे. तब्बल 36 तासानंतर त्यांचा मृतदेह नेत्रावती नदीमध्ये सापडला आहे. ते सोमवारपासून बेपत्ता होते. व्ही. जी. सिद्धार्थ हे कॅफे कॉफी डेचे संस्थापक, मालक आणि भाजपा नेते एस. एम. कृष्णा यांचे जावई होते. दरम्यान, त्यांचा मृतदेह शवविच्छेदन करून त्यांच्या कुटुंबियांकडे सोपवण्यात येणार आहे.