राहुल गांधी यांचा भाजपवर निशाणा
नवी दिल्ली : कर्नाटकात कॉंग्रेस आणि जेडीएसचे सरकार कोसळल्यानंतर कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. कर्नाटकमध्ये लालसेचा विजय झाला असल्याचे सांगत राहुल गांधी यांनी भाजपवर टीका केली. त्यांनी एका ट्विटच्या माध्यमातून ही टीका केली आहे. तर दुसरीकडे कॉंग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनीदेखील ट्विट करत भाजपवर हल्लाबोल केला आहे.
From its first day, the Cong-JDS alliance in Karnataka was a target for vested interests, both within & outside, who saw the alliance as a threat & an obstacle in their path to power.
Their greed won today.
Democracy, honesty & the people of Karnataka lost.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) July 23, 2019
कर्नाटक सरकार स्थापन झाल्याच्या पहिल्या दिवसापासून एका स्वार्थी हेतूने बाहेरून आणि आतून निशाण्यावर होते त्यामुळे जे लोक या कॉंग्रेसच्या आघाडीच्या सरकारला एका धोका किंवा अडथळ्यांच्या स्वरूपात पाहत होते त्यांच्या लालसेचा आज विजय झाला. आणि लोकशाही आणि प्रामाणिकपणाचा पराभव झाला अशा प्रकारचे ट्विट करत राहुल गांधी यांनी आपली नाराजी व्यक्त केली. तर दुसरीकडे प्रियंका गांधी यांनी देखील भाजपवर टीका केली.
One day the BJP will discover that everything cannot be bought, everyone cannot be bullied and every lie is eventually exposed.
1/2
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) July 23, 2019
सगळं खरेदी केलं जाऊ शकत नाही, प्रत्येकाची बोली लावता येत नाही आणि प्रत्येक खोट्या गोष्टीचा एकदिवस पर्दाफाश होतो हे एक दिवस भाजपच्या लक्षात येईल, तोपर्यंत मला वाटतं देशातील जनतेला कमजोर होणारी लोकशाही, बेलगाम भ्रष्टाचार आणि संस्थांचा विद्धवंस सहन करावा लागेल अशा प्रकारचे ट्वीट प्रियंका गांधी यांनी केले आहे.