नवी दिल्ली – भारताचे मालिकेतील आव्हान संपलेले नाही. त्यामुळे भारतीय संघाला मालिकेत दमदार पुनरागमन करायचे असेल तर त्यांना सांघिक खेळ करावा लागेल, असे मत माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू महंमद कैफ याने व्यक्त केले आहे.
पहिल्या कसोटीत झालेल्या पराभवानंतर भारतीय संघावर जोरदार टीका सुरु आहे. मात्र, त्यांना आता खऱ्या प्रोत्साहनाची गरज आहे. त्यामुळे एका सामन्यातील कामगिरीवरुन गुणवत्तेचा निकष ठरवला जाऊ नये, असेही कैफ म्हणाला.