नवी दिल्ली – देशात शेतकरी संघटना नव्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीत आंदोलन करत आहेत. त्यातच सरकारकडून याबाबतीत कोणताही तोडगा निघाला नसल्याने शेतकरी संघटना आणखी आक्रमक झाल्या आहेत. अशातच मोदी सरकारने शेतकऱ्यांना फसवले असून याचा मी तीव्र निषेध करतो असे म्हणत पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल यांनी पद्मविभूषण पुरस्कार परत केला आहे.
प्रकाश सिंह बादल यांनी म्हंटले कि, केंद्र सरकारचे कृषी कायदे जाचक व शेतकऱ्यांसाठी घातक आहेत. या सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी काहीही देणे-घेणे नाही या गोष्टींचा निषेध करत माझा पद्मविभूषण पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला आहे, असे त्यांनी ट्विट करून सांगितले आहे.
Former Punjab CM Parkash Singh Badal returns Padma Vibhushan to protest “the betrayal of the farmers by govt of India” pic.twitter.com/mzdsoAZSlC
— ANI (@ANI) December 3, 2020
दरम्यान, कृषी कायद्यांमधील मुद्यांवरुन उद्या पुन्हा शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा होईल, अशी माहिती कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी दिली. तर दुसरीकडे शेतकरी संघटना देशभरात ५ डिसेंबरला आंदोलन करणार आहेत. पंजाबमधील सर्व खेळाडू ७ डिसेंबरला पुरस्कार वापसी करणार आहेत. अन्य खेळाडू आणि कलाकारांनीही पुरस्कार वापसी करण्याचं आवाहन करण्यात आले आहे.