पुणे – बदलती जीवनशैली, अपुरी झोप, जंक फूड आणि शरिराराला पुरेशे पाणी न देणे यामुळे यकृत निकामी होण्याचे प्रमाण मागील काही वर्षांत वाढल्याचे दिसून येते. त्यावर यकृत प्रत्यारोपणाशिवाय दुसरा पर्यायच नाही. असे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचे निरिक्षण त्यामुळे आजही पुणे विभागात एकूण 534 गरजू व्यक्ती यकृताच्या प्रतिक्षेत असल्याची माहिती झेडटीसीसी कडून देण्यात आली. या आकडेवरून परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येते.
झोप व पाणी महत्त्वाचे
आजच्या काळात झोपेशी संबंधित आजारांचे प्रमाण वाढत असताना याचा परिणाम यकृताच्या आरोग्यावरही होत आहे. जेव्हा आपण रात्री विश्रांती घेतो तेव्हा यकृताची दुरुस्तीची प्रक्रिया सुरु असते. त्यामुळे नियमित झोपेचा अभाव यकृताच्या आरोग्यावर विपरित परिणाम करू शकतो. त्याचप्रमाणे शरीरामध्ये पाण्याची पातळी पुरेशी प्रमाणात राहिल्यास यकृत निरोगी आणि त्याची कार्यक्षमता टिकून राहण्यास मदत होते. त्यामुळे शिरिरात पाण्याचे प्रमाण योग्य असणे गरजेचे आहे.
खराब झालेले यकृत बरे होऊ शकते
जरी यासाठी कुठलीही जादूची कांडी नसली तरी फायब्रोसिस आणि फॅटी लिव्हर हे यकृताच्या आजारांचे मानले जाणारे पहिले दोन टप्पे योग्य औषधोपचार, नियमित आहार आणि व्यायाम तसेच जीवनशैलीतील बदल यामुळे बरे होऊ शकतात, असे डॉ. बिपीन विभुते यांनी सांगितले. परंतु जेव्हा यकृताची कार्य करण्याची क्षमता पूर्णपणे कमी होते आणि त्याचे रूपांतर सिऱ्हॉसिसमध्ये होते तेव्हा यकृत प्रत्यारोपण हा एकमेव पर्याय उरतो.
अशी घ्या यकृताची काळजी
आरोग्यपूर्ण वजन राखा
मद्यपान आणि धुम्रपान टाळा
आरोग्यपूर्ण आहार घ्या
वषारी द्रव्यांपासून दूर रहा
आजाराची लक्षणे असल्यास नियमित तपासणी करत रहा