Chandrashekhar Bawankule On Vijay Wadettiwar| उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातील विद्यमान खासदार पूनम महाजन यांचा पत्ता कट करत यावेळी भाजपने ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यानंतर त्यांनी प्रचारा देखील सुरूवात केली असून यादरम्यान मुंबई हल्ला प्रकरण चर्चेत आले आहे. त्यानंतर आता विरोधकांनी उज्ज्वल निकम यांच्यावर निशाणा साधला आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी देशद्रोह्याला भाजपने उमेदवारी दिल्याचा आरोप केला आहे. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विजय वडेट्टीवार यांना प्रत्युत्तर दिले आहे.
पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांचा खून दहशतवादी कसाबच्या बंदुकीने झाला नव्हता. तर ती गोळी आरएसएसशी संबंधित एका पोलीस अधिकाऱ्याची होती. पण हे सत्य निकम यांनी न्यायालयापासून लपवून ठेवले. या देशद्रोह्याला भाजपने उमेदवारी दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक्स या सोशल मिडिया माध्यमावर पोस्ट शेअर करत विजय वडेट्टीवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पुन्हा एकदा अकलेचे तारे तोडत पाकिस्तानधार्जिणी भूमिका घेतली. शहीद हेमंत करकरे यांच्यावर चाललेली गोळी पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाबची नव्हती असा जावईशोध वडेट्टीवार यांनी लावला.
निवडणुकीत मतं मिळविण्यासाठी काँग्रेस किती खालच्या पातळीला जाणार?… pic.twitter.com/MHne6oawNG
— Chandrashekhar Bawankule (Modi Ka Parivar) (@cbawankule) May 5, 2024
चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले? Chandrashekhar Bawankule On Vijay Wadettiwar|
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, “विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पुन्हा एकदा अकलेचे तारे तोडत पाकिस्तान धार्जिणी भूमिका घेतली. शहीद हेमंत करकरे यांच्यावर चाललेली गोळी पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाबची नव्हती असा जावईशोध वडेट्टीवार यांनी लावला. निवडणुकीत मतं मिळविण्यासाठी काँग्रेस किती खालच्या पातळीला जाणार? भाजपाला विरोध करण्यासाठी तुम्ही 26/11 मुंबई हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा,” असे म्हंटले आहे.
पुढे बावनकुळे म्हणाले, “जेव्हापासून मोदीजी सत्तेत आले दहशतवाद्यांचं कंबरडं मोडलं पण आज काँग्रेस दहशतवाद्यांसाठी अश्रू गाळत आहेत. महाराष्ट्रात मविआ सत्तेत असताना याकुबच्या कबरीवर सुशोभीकरण केलं आता कसाबचा पुळका आला आहे. काँग्रेस आणि वडेट्टीवार यांच्या पाकधार्जिण्या भूमिकेबद्दल जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही,” असा इशाराही चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला.
हेही वाचा: