मुंबई – महाराष्ट्र दिनीच्या दिवशीच गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांनी भ्याड हल्ला घडवून आणला. यात 15 जवान आणि एक चालक शहीद झाले . या भ्याड हल्ल्याचं सर्व स्तरातून तीव्र शब्दांमध्ये निषेध व्यक्त केला जात आहे.
गडचिरोली येथे झालेल्या नक्षलवाद्यांच्या हल्ल्याचा मुख्यमंत्री देवेंद्द फडणवीस यांच्याकडून तीव्र शब्दात निषेध करण्यात आला आहे. याबाबत त्यांनी ट्विट केले आहे. तसेच पोलिस महासंचालक आणि गडचिरोलीच्या पोलीस अधीक्षकांसोबतही संपर्कात असल्याची मुख्यमंत्र्यांकडून माहिती देण्यात आली आहे. मुंख्यमंत्र्यांनी ट्विट करत या हल्लाबदल दुख व्यक्त केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, नक्षलवाद्यांच्या भ्याड हल्ल्याचा निषेध. माझं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी बोलणं झालंय.
Anguished to know that our 16 police personnel from Gadchiroli C-60 force got martyred in a cowardly attack by naxals today.
My thoughts and prayers are with the martyrs’ families.
I’m in touch with DGP and Gadchiroli SP.#Gadchiroli— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) May 1, 2019