मुंबई – एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत पहिला उपांत्य सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर येत्या बुधवारी यजमान भारत व न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. या मैदानावरील आतापर्यंतची भारतीय संघाची कामगिरी संमिश्र राहीली आहे.
यंदाच्या स्पर्धेत भारतीय संघाने सलग वॉनऊ सामने जिंकले आहेत. विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत ऑस्ट्रेलियानंतर इतके सामने सलग जिंकण्याची भारताची ही पहिलीच वेळ आहे. या स्पर्धेतील साखळी लढतीत भारताने न्युझीलंडचा पराभव केला होता व आता येत्या बुधवारीही हे दोन्ही संघ पुन्हा एकदा आमनेसामने येत आहेत.
वानखेडेची आकडेवारी अशी आहे
– दमट हवेमुळे चेंडूला स्विंग मिळतो
– दुपारनंतर फिरकीलाही साथ मिळते
– 2011 सालच्या स्पर्धेचा आंतिम सामना येथेच झाला
– भारताने त्यावेळी श्रीलंकेचा पराभव केला होता
– 1983 सालानंतर 28 वर्षांनी तेव्हा भारत विश्वविजेता ठरला
– 12 वर्षांच्या मोठ्या कालखंडानंतर यंदा भारताला संधी
– 1987 सालापासून येथे 27 सामने झाले
– त्यात भारताचे 19 सामने खेळवले गेले
– 10 सामन्यांत भारताचा विजय
– 9 लढतींत पराभव
– पहिल्यांदा फलंदाजी करताना 13 संघ विजयी
– धावांचा पाठलाग करताना 14 संघ विजयी
– 2015 साली दक्षिण आफ्रिकेची सर्वोच्च धावसंख्या (484)
– भारताने येथे 300 पेक्षा जास्त धावसंख्या उभारलेली नाही
– श्रीलंकेची सर्वात निचांकी धावसंख्या (55)
– महंमद शमीचे त्या सामन्यात 5 बळी
– या मैदानावर सचिन तेंडुलकर सर्वात यशस्वी
– 11 सामन्यांत 455 धावा
– सर्वाधिक बळी व्यंकटेश प्रसादच्या नावावर (15)
– फिरकी गोलंदाज अनील कुंबळेही यशस्वी (12)
– ऑस्ट्रेलियाच्या वॉर्नर व फिंचची सर्वोच्च 258 धावांची भागीदारी
– कोहली व सुरेश रैना यांची 2011 साली 131 धावांची भागीदारी
– या मैदानावर डीकॉकच्या सर्वोच्च वैयक्तीक 174 धावा
– कोहलीच्या 121, सचिन तेंडुलकर 114, अझरुद्दीन 108
– मुरली कार्तिकचे 2007 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक 6 बळी