सोलापूर – मराठा समाजाचा छळ करणारे देवेंद्र फडणवीस जोपर्यंत भाजपमध्ये आहेत, तोपर्यंत भाजपला सहकार्य करणार नाही, अशी भूमिका सोलापूर जिल्ह्यातील कोंडी या गावासह आजूबाजूच्या गावातील मराठा समाज बांधवांनी घेतली आहे.
भाजपसह त्यांच्या मित्रपक्षातील कोणत्याही नेत्याला ग्रामस्थ सहकार्य तसेच आगामी निवडणुकांमध्ये मतदान करणार नसल्याचेही ग्रामस्थांनी जाहीर केले आहे.
गावकऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना साक्षी ठेवत मराठा समाज बांधवांनी शपथ घेत भाजपला मतदान न करण्याचा निर्धार केला आहे.
मराठा समाजाचा छळ करण्याचे काम त्यांनी केले असून त्यांना त्यांची जागा दाखवणार असल्याचा इशारा या ग्रामस्थांनी दिला आहे. कोणतीही निवडणूक असो, प्रचाराची गाडी गावात आल्यास त्यांना मदत करणार नाही. मराठा समाज भाजपला मतदान करणार नाही, असे या ग्रामस्थांनी म्हटले आहे.