नवी दिल्ली – पंजाब-हरियाणाच्या शंभू-खनौरी सीमेवर आंदोलन करणारे शेतकरी ६ मार्चला दिल्लीकडे कूच करणार आहेत. तसेच, १० मार्च रोजी दुपारी १२ ते ४ या वेळेत देशभरातील रेल्वे गाड्याही शेतकऱ्यांच्या वतीने थांबवण्यात येणार आहेत.
रविवारी (३ मार्च) भटिंडा येथे शुभकरन सिंह यांच्या शेवटच्या अर्दासवेळी शेतकरी नेते सर्वनसिंह पंढेर यांनी मंचावरून ही घोषणा केली. पंढेर म्हणाले की, हरियाणा-पंजाबमधील शेतकरी खनौरी-शंभू सीमेवरच आंदोलन करतील,
तर उर्वरित देशातील शेतकरी त्या दिवशी दिल्लीला पोहोचतील. ६ मार्चला हरियाणा-पंजाब वगळता इतर राज्यातील शेतकरी आपापल्या मार्गाने दिल्लीत पोहोचतील.
सरकारचे म्हणणे आहे की, शेतकरी ट्रेन-बसने दिल्लीला पोहोचू शकतात, तर बिहार-कर्नाटकमधून दिल्लीला जाणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी ट्रेनमधून अटक केली. शेतकऱ्यांना ट्रॅक्टर ट्रॉलीशिवायही दिल्लीत येऊ द्यायचे आहे की नाही हे ६ मार्चच्या मोर्चामुळे स्पष्ट होईल, असेही पंढेर म्हणाले.
पाकिस्तान-चीनसारखी सीमा बनवली
आजपर्यंतच्या इतिहासात कोणत्याही आंदोलनात ड्रोनचा वापर झालेला नाही. सरकारने ड्रोनचा वापर करून बाहेरून अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. सरकारने हरियाणा-पंजाबची सीमा पाकिस्तान आणि चीनची सीमा केली.
त्या सीमांवर तारा लावलेल्या आहेत, पण सरकारने पंजाब-हरियाणा सीमेवर फक्त भिंती उभ्या केल्या आहेत. भारत-पाकिस्तान आणि भारत-चीन सीमेवरही कायदे आहेत, पण हरियाणा-पंजाब सीमेवर कायदा नाही. केंद्र सरकारने ७० हजार सैन्याचा वापर केल्याचा आरोपही यावेळी त्यांनी केला.
शवविच्छेदनात शुभकरनच्या डोक्यात धातूचे तुकडे
शेतकरी शुभकरणच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मोठा खुलासा झाला आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या डोक्यावर धातूचे काही तुकडे आढळून आले आहेत. जे खऱ्या बुलेटशी जोडले जात आहेत.
पंजाब पोलिसांनी हा अहवाल हरियाणा पोलिसांना पाठवला आहे. काही पोलिस अधिकारी असेही सांगतात की रबराच्या बुलेटलाही मेटल जोडलेले असते. खनौरी सीमेवर हरियाणा पोलिसांनी रबरी गोळ्या झाडल्या असण्याची शक्यता आहे आणि तीच शुभकरनच्या डोक्याला लागली.
केंद्रीय गृहराज्यमंत्री टेनी यांच्या टिकीटाला विरोध
उत्तर प्रदेशातील लखीमपुरी खेरी लोकसभा मतदारसंघातून अजय मिश्रा टेनी यांना भाजपकडून पुन्हा तिकीट मिळाल्याच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी आंदोलन केले. सरवनसिंह पंढेर म्हणाले की, टेनी यांना तिकीट देऊन देशातील शेतकरी, कष्टकऱ्यांचा अपमान केला आहे.
किसान मजदूर मोर्चा याचा तीव्र शब्दात निषेध करतो. यासाठी देशातील १४० कोटी जनता भाजपला नक्कीच धडा शिकवेल. अजय टेनी यांना केंद्रीय मंत्रिमंडळातून बडतर्फ करण्याची मागणी शेतकरी करत होते, पण केंद्राने ती मान्य केली नाही.