गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात काँग्रेस पक्ष फुटणार असल्याची चर्चा रंगली आहे. काँग्रेस पक्षातील प्रमुख नेते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सध्या राज्यातील नेत्यांमध्ये रंगली आहे. अशात भाजप पक्षाचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
एक कार्यक्रमात पत्रकरांशी बोलतांना ते म्हणाले,’माजी मंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण भाजपात आले तर त्यांचं स्वागत करू’ यावेळी चिखलीकर यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या एका वक्तव्याचा हवाला दिला आहे.
ते पुढे म्हणाले,’१०० वॉरियर्स’च्या बैठकीच्या निमित्त त्यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. याच कार्यक्रमातून बावनकुळेंनी काही काँग्रेसच्या नेत्यांचा उल्लेख करत ते भाजपात येण्यास इच्छुक असल्याचं म्हटलं आहे’ याबाबतचा दावा चिखलीकर यांनी केला.
चिखलीकर पुढे म्हणाले,’भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे ‘१०० वॉरियर्स’च्या बैठकीनिमित्त नांदेडला आले होते. यावेळी ते म्हणाले की, भारतीय जनता पार्टीचा दुपट्टा टाकण्यासाठी अनेक लोक रांगेत आहेत. त्यामध्ये त्यांनी नांदेडच्या काही काँग्रेसच्या नेत्याच्या नावाचा उल्लेख केला. यावरून आपण लक्षात घेतलं पाहिजे की, अशोक चव्हाणांसाठी हे नवीन नाही. ते सत्तेसाठी भाजपात येऊ शकतात. ते इकडे आले तर त्यांचं भारतीय जनता पार्टीकडून स्वागत आहे.’ असेही ते म्हणाले आहे.