Budget 2024 – अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी सकाळी 11 वाजता संसदेत आर्थिक वर्ष 2024-25 चा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. निवडणुकीपूर्वी सादर होणारा मोदी सरकारच्या चालू कार्यकाळातील हा शेवटचा अर्थसंकल्प होता. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात सुमारे तासभर भाषण केले. अर्थसंकल्पाकडून जनतेच्या खूप अपेक्षा होत्या. अर्थसंकल्पाबाबत देशभरातील नेत्यांच्या प्रतिक्रियाही येऊ लागल्या आहेत. फक्त महाराष्ट्रावर अन्याय का ? असा सवाल आज सादर करण्यात आलेल्या बजेटवर माजी मंत्री आणि शिवसेना (ठाकरे गट ) नेते आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
फक्त महाराष्ट्रावर अन्याय का ? आम्हाला समानतेनं आणि न्याय्य पद्धतीने का वागवलं जात नाही ? असा सवालच आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला आहे. आदित्य ठाकरेंनी याबाबत एक ट्विट केले आहे. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात,”अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशभरातील विमानतळांच्या विस्ताराविषयीचा मुद्दा मांडला. पण मग महाराष्ट्राला या योजनेतील समान हिस्सेदार का मानलं जात नाही?”
ठाकरे पुढे म्हणतात,”पुण्यातील प्रस्तावित नवीन विमानतळाबाबत एक शब्दही अर्थसंकल्पात का नाही ? MVA सरकारनं प्रस्तावित केलेलं विमानतळ विद्यमान सरकारनं रद्द ठरवलं. सध्याच्या विमानतळातल्या नव्या टर्मिनलच्या उद्घाटनासाठीही या सरकारला वेळ नाही. गेल्या ५ महिन्यांपासून हे टर्मिनल बांधून तयार असल्याचं देखील आदित्य ठाकरेंनी यावेळी स्पष्ट केलं आहे.
The FM spoke about #UDAN and rapid airport expansion across the country.
The question remains, why isn’t Maharashtra considered an equal part of the entire scheme of things?
No word on Pune’s proposed new airport.
The one proposed by the MVA Govt was scrapped by the current…— Aaditya Thackeray (@AUThackeray) February 1, 2024
CM शिंदे म्हणतात..
गेल्या ६० वर्षांत जे निर्णय झाले नाहीत, ते गेल्या १० वर्षांत झाले. गरीब, शेतकरी, महिला व तरुण या चार प्रमुख घटकांना त्यांनी न्याय दिला. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम कसं करावं, हे त्यांनी दाखवून दिलं. आजच्या अर्थसंकल्पात महिला व मुलींना प्राधान्य दिलं आहे. पंतप्रधान आवास योजनेत २ कोटी घरं वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एक प्रकारे रोटी, कपडा, मकान देणारा हा अर्थसंकल्प व हे केंद्र सरकार आहे अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.यांनी दिली.
मोदी काय म्हणाले ?
अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना देताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, देशाचे भविष्य घडवणारा हा अर्थसंकल्प आहे. विकसित भारतासाठी हा एक समर्पित अर्थसंकल्प आहे. हा अर्थसंकल्प युवा भारताच्या युवा आकांक्षांचे प्रतिबिंब आहे. ही एक मजबूत भविष्याची हमी आहे.