नवी दिल्ली – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाबाबत तेलंगणाला काहीही मिळाले नसल्याचा आरोप बीआरएसचे पक्षाच्या कार्याध्यक्ष आणि आमदार कलवकुंतला तारका रामा राव यांनी केला आहे. या प्रकरणात राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या मौनावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
एक्सवर त्यांनी म्हटले आहे की, “तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांकडून भाजपविरोधात एक शब्दही नाही!! बधिर शांतता. तुम्हाला कशाची भीती वाटते? राज्याच्या हितासाठी ही शरणागती का? राज्यावर झालेल्या अन्यायाबाबत पूर्णपणे गप्प राहणे, खरोखरच भयावह आहे अशी टीकाही त्यांनी राज्य सरकारवर केली आहे.
बीआरएस नेत्याने त्यांच्या पोस्टमध्ये तेलंगणाला केंद्रीय अर्थसंकल्पात शून्य मिळाले आहे असे दर्शवणाऱ्या पोस्टरचे चित्र देखील जोडले आहे. या अर्थसंकल्पात हिमाचल प्रदेशलाही काही मिळालेले नाहीं असे त्या राज्याचे मुख्यमंत्री सुखु यांनी म्हटले आहे.
केंद्राने अनेक राज्यांची देणी थकवली आहेत, हजारो कोटी रूपयांची ही देणी हे सरकार कधी देणार असे प्रश्न विरोधी पक्षांची सरकारे असलेल्या राज्यांतून विचारले जात आहेत.