मुंबई – शिवसेना नेते संजय राऊत निर्दोष असतील, तर त्यांनी त्यांच्यावरील अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) कारवाईला घाबरू नये असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. औरंगाबादमध्ये पत्रकारांशी बोलताना शिंदे म्हणाले, राऊत यांनी आपण काहीही चुकीचे केले नसल्याचे जाहीर केले आहे. तसे असेल तर चौकशीची भीती का? ते होऊ द्या. जर तुम्ही निर्दोष असाल तर घाबरण्याचे कारण काय?.
शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी आपण परिस्थितीने मजबूर झाल्याने बंडखोर सेनेच्या छावणीत सामील झाल्याचे विधान केले होते. त्यावर विचारलेल्या प्रश्नाला मुख्यमंत्री म्हणाले,की आम्ही त्यांना निमंत्रण दिले होते का? ईडीच्या भीतीने आमच्याकडे किंवा भाजपमध्ये येऊ नका अशी सुचनाहीं त्यांनी केली. दरम्यान, महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) नेत्यांनीही राऊत यांनी काही चुकीचे केले नसेल तर त्यांनी ईडीच्या कारवाईला घाबरू नये, असे म्हटले आहे.