मुंबई – अभिनेत्री तेजस्वी प्रकाश आणि अभिनेता करण कुंद्रा प्रसिद्ध आणि आवडत्या सेलिब्रिटी जोडप्यांपैकी एक आहे. सोशल मीडियावर ते नेहमीच पोस्ट्स शेअर करत असतात. पोस्टमध्ये हे जोडपे एकमेकांवर प्रेम व्यक्त करताना दिसतात. चाहते त्यांच्या केमिस्ट्रीचे नेहमीच कौतुक करत असतात. बिग बॉसच्या घरात या दोघांची जोडी अनेकांच्या पसंतीस पडली होती. मात्र आता हे दोघे लग्न कधी करणार अशी विचारणा सतत केली जात आहे. त्यानंतर आता तेजस्विनीने एका मुलाखतीत लग्नाबाबत भाष्य केले आहे.
तेजस्वी म्हणाली की, “माझ्या आणि करणच्या लग्नाबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. पण मी लग्नासाठी तयार आहे असं जेव्हा मला वाटेल तेव्हा मी नक्कीच लग्न करण्याचा निर्णय घेईल. आमच्या दोघांची काही स्वप्न आहेत ती पूर्ण करण्याचा सध्या आम्ही प्रयत्न करत आहोत. आमच्यावर कोणाचाही दबाव नाही, त्यामुळे मी जेव्हा लग्नासाठी तयार असेल तेव्हा तो माझ्यासोबत लग्न करेल,” असे स्पष्ट तेजस्वी प्रकाशने सांगितले.
याआधी देखील तेजस्वीने लग्नाविषयी भाष्य केले होते. “मला असे वाटते की मी याबद्दल जितके जास्त बोलतो तितके लोक तुमच्या आयुष्यातील सुंदर गोष्टींपासून दूर जातात. त्यामुळे लग्न करणे ही माझ्या आयुष्यातील खूप महत्त्वाची गोष्ट आहे. लग्न तिच्यासाठी खूप महत्त्वाचं असल्याचे तिने सांगितले होते. तसेच लग्नाचा प्लॅन प्रत्यक्षात येईपर्यंत त्याबद्दल बोलू इच्छित नसल्याचेही तिने सांगितले होते.
दरम्यान, तेजस्वी आणि करण ‘बिग बॉस 15’ दरम्यान एकमेकांच्या प्रेमात पडले होते. यानंतर त्यांचे नाते फुलले. त्यांच्या नात्याची सुरुवात भांडणातून झाली, पण हळूहळू त्याचे रुपांतर प्रेमात झाले आणि दोघांनी डेट करायला सुरुवात केली. बिग बॉस 15 नंतरही तेजस्वी आणि करण त्यांच्या नात्यावर ठाम आहेत. त्यामुळे लवकरच त्यांनी लग्नाबंधनात अडकण्याचा सल्ला अनेकजण देत आहेत.