मुंबई : राज्यातील सत्तापेचावर सर्वोच्च न्यायालय आज निर्णय देणार आहे. तत्पुर्वी शिवसेना-कॉंग्रेस-राष्ट्रवादीने आपल्या सर्व आमदारांसह शक्तिपरीक्षेची रंगीत तालीम घेतली. त्यानंतर आमदारांना सायंकाळी ग्रॅंड हयात या पंचतारांकित हॉटेलात एकजुटीची शपथ देण्यात आली. या तिन्ही पक्षांनी आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र राज्यपालांना सादर केले आणि सत्तास्थापन करण्यास त्यांना पाचारण करण्याची विनंतीदेखील केली आहे.
— Sanjay Raut (@rautsanjay61) November 26, 2019
दरम्यान शिवसेना नेते संजय राऊत यांनी एक सूचक ट्विट केलं आहे. संजय राऊत यांनी ट्विटमध्ये, आणि अधिक&वेट ऍण्ड वॉच असं म्हटलं आहे.
नारायण राणे यांनी मात्र ग्रॅंड हयात हॉटेलमध्ये फक्त 130 आमदार होते असा दावा केला आहे. त्यांच्या हातात आमदारच नाहीत, असाही आरोप नारायण राणेंनी केला. ग्रॅंड हयात या हॉटेलमध्ये आमदार नव्हते तर आमदारच उपस्थित होते, जे आमदार आले नाहीत त्यातला सगळ्यात मोठा खड्डा शिवसेनेला पडला आहे. अनेक आमदार विधान परिषदेचे होते असंही नारायण राणे यांनी म्हटले आहे. यासर्व पार्श्वभूमीवर संजय राऊतांचे ट्विट नेमकं कोणत्या अर्थाने आहे हे समजणे सध्याच्या परिस्थितीत गोंधळात टाकण्यासारखे आहे.