Uday Samant : ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. दहिसरमध्ये हा थरार घडला असून या थराराचे लाईव्ह फुटेज हल्लेखोर मॉरिसच्या फेसबुक लाईव्हमुळे समोर आले आहेत. पूर्व वैमनस्यातून हा हल्ला झाल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान, या हल्ल्यानंतर हल्लेखोर मॉरिसनेही आत्महत्या केली. दरम्यान, याप्रकणी आता शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडत ठाकरे गटावर गंभीर आरोप केले आहेत.
अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरणी विरोधकांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप करण्यात येत आहेत. याच आरोपांना उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले आहे. यावेळी बोलताना त्यांनी, घटना दुर्दैवी सरकार याबाबात कारवाई करेल कोणत्याही पक्षाच्या नेत्याच्या घरात असा प्रसंग घडू नये घोसाळकर कुटुंबासोबत आम्ही असल्याचे म्हणत घोसाळकर कुटुंबाचे सांत्वन केले. तसेच मुंबईतील गोळीबाराची घटना उद्धव ठाकरे गटातील गॅंगवॉर असलयाचे सांगत त्यांनी ठाकरे गटावर गंभीर आरोप केले आहेत. यासाठी त्यांनी शिवसेनेचे मुखपत्र सामनातील काही कात्रणांचा पुरावा पत्रकार परिषदेत सादर केला आणि सामानातूनच मॉरिसला मोठं करण्यात आले असल्याचे म्हटले.
पुढे बोलताना उदय सामंत यांनी प्रत्येक घटनेत राजकारण करण्याचा विरोधकांचा प्रयत्न असल्याचे सांगत कोणतीही वाईट घटना घडली कि ती शिंदेंमुळे घडली असा आरोप विरोधक करतात, आपल्या अंगावर आलेले पाप दुसऱ्याच्या माथी मारायचं असं विरोधक काम वेळोवेळी विरोधकांकडून करण्यात आले आहे यावेळीही हाच प्रकार करण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला असल्याचे सामंत यांनी यावेळी म्हटले.
तसेच मॉरिस शिंदेंना भेटले असे विरोधक सांगत आहेत त्यासोबत माजी नगरसेवक फेसबुक लाईव्हच्या अगोदर कोणाला भेटले हे पाहणे देखील करणे गरजेचे आहे. एवढे नाही तर घोसाळकर-मॉरिस यांना तडजोड करायला कोणी लावले ? हे समोर यायला हवं अशी मागणी देखील यावेळी उदय सामंत यांनी यावेळी केली.