मुंबई- जे स्वत:चे राजकीय अस्तित्व परपक्षाच्या खांद्यावर बसून करतात त्यांनी दुसऱ्यावर बोलू नये. शिवसेनेचे विश्वविख्यात प्रवक्ते आणि कॉंग्रेस प्रवक्त्याच्या हिरव्या उचक्या वाढायला लागल्या आहेत, असा घणाघात भाजपचे नेते आशिष शेलारांनी केला आहे.
तसेच मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून शिवसेनेवर त्यांनी कोरडे ओढले. भ्रष्टाचाराचे कुरण कसे वाढतेय. जमिनीचे भाव प्रचंड असताना कवडीमोल किमतीला सरकारी जागा देण्याचे काम ठाकरे सरकार करते आहे. पोलखोलच्या माध्यमातून आम्ही ठाकरे सरकारची अनेक प्रकरणे समोर आणत आहोत, असेही आशिष शेलार म्हणाले.
भोंग्याच्या विषयावर ते म्हणाले की, शक्तीपीठ, तीर्थस्थान, प्रार्थनालय हे वेगवेगळे आहेत. तीर्थस्थानी लाउडस्पीकरची आवश्यकता असते. मशिदीवरील अनधिकृत भोंगे काढावे लागले म्हणून शक्तीपीठ तीर्थस्थळावर कारवाई केली, असा आरोप त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर केला.