मुंबई – राज्याच्या राजकारणात भूकंप झाला आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. यावेळी राजभवनात कार्यकर्त्यांनी एकच वादा अजित दादा अशा घोषणा देण्यात आल्या आहे. दरम्यान, अजित पवारांनी दिलेला अल्टिमेटम शरद पवारांनी मान्य न केल्यामुळे शरद पवार नाराज असल्याची माहिती समोर आली होती.
अजित पवारांकडे ३५ आमदारांचा पाठिंबा असल्याचे पत्र अजित पवारांकडे आहे. राजभवनाकडे शासकीय गाडी न वापरता खासगी वाहनाचा वापर केला आहे. छगन भुजबळ यांच्यासह अन्य नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.
दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘हे’ ट्रीपल इंजिन सरकार राज्याच्या जलद गतीने विकास करेल असं म्हणत प्रतिक्रिया दिली आहे. ते पुढे म्हणाले आम्ही एकत्र राज्याच्या विकास करू आणि हे सरकारला जनतेच्या विकासावर काम करण्यास तत्पर राहील. असेही शिंदे म्हणाले आहे.