Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha Election 2024 – रत्नागिरी- सिंधुदुर्ग मतदारसंघात महायुतीत भाजपाकडून नारायण राणे (Narayan Rane) उमेदवार आहेत. तर याच ठिकाणी महाविकास आघाडीतून ठाकरे गटाने विनायक राऊत (Vinayak Raut) यांना उमेदवारी दिली आहे. तिसऱ्या टप्प्यात 7 मे रोजी येथील मतदान होणार आहे. तत्पूर्वी दोन्ही उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरु आहे. आज नारायण राणे यांनी रत्नागिरीतील प्रचारसभेला संबोधित करताना शिवसेना सोडण्याचा किस्सा सांगितला आहे. नारायण राणे म्हणाले, शिवसेना सोडताना मी बाळासाहेब ठाकरे यांना सात पानी पत्र दिले. त्यात शिवसेना सोडण्याची कारणे सांगितली. तसेच उद्धव ठाकरेंसोबत माझे जमणार नाही, असे स्पष्ट सांगून शिवसेना सोडली, असं राणे म्हणाले. त्याचबरोबर मी बाळासाहेब ठाकरेंमुळे घडलो असेही ते म्हणाले. उद्धव ठाकरेंवर टीका – यावेळी बालताना राणे म्हणाले, उद्धव ठाकरे आणि विनायक राऊत यांना प्रत्येक कामात पैसे पाहिजेत. मोदी, शाह आणि फडणवीस यांच्यावर टीका करता. तुम्ही अडीच वर्षात काय xक मारली ते पाहा. योगायोगाने हिंदुत्वाशी गद्धारी करून शरद पवार यांच्या मांडीवर बसून मुख्यमंत्री झालात. मोदींना तडीपार करणार म्हणता, तुमची ताकत किती? मोदींनी ठरवलं तर तुम्हाला तडीपार करू शकतात. विकृत माणूस म्हणजे उद्धव ठाकरे. या मतदार संघातून एकही मत विरोधकांना जाता कामा नये – मतदारांना आवाहन करताना राणे म्हणाले, या जिल्ह्यासाठी विरोधकांनी काय केलं? विरोधक विकासाचं काही सांगत नाहीत. विनायक राऊत निवडणून आला तर काय करणार? सत्ता आमची येणार आहे. मी मंत्री होणार आहे. हवी ती कामं करू शकतो. या मतदार संघातून एकही मत विरोधकांना जाता कामा नये. आता चूक करू नका. तुमचं आमचं तरुण पिढीचं भवितव्य बदलायचं असेल तर मोदींना मतं द्या. सकाळी लवकर उठा. मतदान करा. समोरच्याचं डिपॉजिट करण्यासाठी मला मतदान करा, असं आवाहन नारायण राणे यांनी केलं.