देशात लोकसभा निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्ष सक्रिय झाले आहे. सर्वत्र निवडणुकीच्या हालचालीही सुरू झाल्या आहे. नेत्यांचे दौरेही वाढू लागले आहे. सध्या काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वढेरा निवडणूक प्रचारासाठी आसाममध्ये पोहोचल्या आहे. धुबरी येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना काँग्रेस नेत्याने मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला.
आज बेरोजगारी सर्वाधिक
त्या म्हणाल्या की, हे सरकार पूर्णपणे स्वतःच्या हितावर केंद्रित आहे. ते कसे कमावतील याकडे त्यांचे लक्ष असते. त्याला जनतेच्या संघर्षाची चिंता नाही. आज बेरोजगारी सर्वोच्च पातळीवर आहे. 70 कोटी लोक बेरोजगार आहे.
#WATCH | Dhubri, Assam: Congress National General Secretary Priyanka Gandhi Vadra says, “This govt is entirely focussed on its own interests…They are not bothered about the struggles of the public…Unemployment is the highest today. 70 crore people are unemployed…” pic.twitter.com/Fuwb0CClnd
— ANI (@ANI) May 1, 2024
माफिया राजवट चालू
प्रियंका गांधी वाड्रा म्हणाल्या,’आसाममध्ये ‘माफिया राजवट’ सुरू आहे. तुमचे मुख्यमंत्री काँग्रेस पक्षात असताना त्यांच्यावर गंभीर आरोप झाले होते. भाजपमध्ये प्रवेश करताच त्यांच्यावरील सर्व आरोप धुतले गेले. भाजपने एक वॉशिंग मशीन विकसित केले आहे जिथे भ्रष्ट लोकांना ठेवले आणि साफ केले जाते. त्यांनी ही गोष्ट आधी तुमच्या मुख्यमंत्र्यांसोबत केली.’ अशीही टीका त्यांनी केली आहे.
हे वाचाल का ? गृह मंत्रालयाची माहिती,’दिल्लीतील शाळांना आलेली धमकी पोकळ; घाबरण्याची गरज नाही..’