भाजपने उत्तर मध्य मुंबई लोकसभेच्या विद्यमान खासदार पूनम महाजन यांना तिकीट नाकारत सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना संधी दिली आहे. तर महाविकास आघाडीकडून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे यंदा येथे उज्ज्वल निकम आणि वर्षा गायकवाड यांच्या लढत होणार आहे. मात्र भाजपने पूनम महाजन यांना लोकसभा निवडणुकीचे तिकीट नाकारले आहे. दरम्यान, एका मुलाखती उज्ज्वल निकम यांनी राजकारणात येण्याचं कारण सांगितलं.
नेमकं काय म्हणाले उज्ज्वल निकम
‘भाजपकडून लोकसभा लढण्याविषयी विचारण्यात आल्याचं मी घरी सांगितलं. तेव्हा त्यांनी मला यावर विचार करावा, असं सुचवलं. मीही विचार केला. घरात बोललो. आमच्या घरातच लोकशाही पद्धतीने मतदान झालं. तेव्हा निवडणूक लढवावी, याला बहुमत मिळालं. मी राजकारणात येण्यासाठी फारसा सकारात्मक नव्हतो. पण मग घरच्यांचं राजकारणाात जाण्यासाठी एकमत असल्याने मी राजकारणात आलो आणि आता लोकसभा निवडणूक लढवतो आहे, असं निकम यांनी सांगितलं