नायगाव येथील कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश
नायगाव – पहिल्या सरकारने आश्वासने पाळली नाहीत. पुरंदरमध्ये पक्षपातीपणाने, चुकीच्या पद्धतीने, कोणाच्या इशारावर एखादा अधिकारी वागत असेल, भ्रष्टाचारी, नियम बाह्यवागत असेल अशांना धडा शिकवल्या शिवाय आम्ही राहणार नाही, असा इशारा भारतीय किसान मोर्चाचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष वासुदेव काळे यांनी व्यक्त केला.
नायगाव (ता. पुरंदर) येथे आनंद चौंडकर,सुजाता जाधव,संदिप पिसाळ,अक्षय बोटे यांनी भाजपमध्ये नुकताच प्रवेश केला त्यावेळी काळे बोलत होते. यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष जालिंदर कामठे, पुरंदर तालुका अध्यक्ष गंगाराम जगदाळे, भाजपा किसान मोर्चाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष गणेश जगताप, मैना जाधव, गोविंद भोसले, दत्ता धेंडे, शिवाजी कोलते, संजय होले, दिलीप फडतरे, सुभाष चौंडकर, किशोर खळदकर, महेश कड, योगेश घाटे, किरण साळुंके, अजित मेमाणे, मंगेश चौंडकर, गोरख जगताप आदी उपस्थित होते.
गंगाराम जगदाळे म्हणाले की, भाजपमध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाला ताकद दिली जाईल.त्याच्या,गावच्या आडचणी सोडवण्यासाठी मदत
केली जाईल. तसचे यावेळी त्यांच्यावर पोलीस स्टेशनकडून कसा अन्याय झाला याचा पाढाच त्यांनी वाचला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष गायकवाड यांनी तर गणेश जगताप यांनी आभार मानले.
पुरंदर तालुका आता मागे गेला आहे. पुढे या तालुक्याचा बॅकलॉग भरून काढू. प्रत्येक निवडणुकीत कार्यकर्त्याला ताकद देऊ. पोलीस ठाण्याने कोणावरही अन्याय करू नये.
– जालिंदर कामठे, अध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र, भाजप