मुंबई – संपूर्ण राज्यात करोना बाधितांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील दैनंदिन रुग्णसंख्या ही 40 हजारांच्या घरात असल्याचं पहायला मिळत आहे. त्यामुळे राज्यात आता आणखी कठोर निर्बंध लागू करण्याची आवश्यकता आहे का?
अशी चर्चा सुरू झाली आहे. याच संदर्भात आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपलं मत व्यक्त केलं. पुण्यात माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी राज्यातील जनतेला एक सूचक इशारा दिला असल्याचं दिसून आलं.
– नक्की काय उपमुख्यमंत्री अजित पवार
दिवसागणित राज्यातील करून विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. महाराष्ट्रात जर 700 मेट्रीक टन पेक्षाही जास्त ऑक्सिजनची मागणी निर्माण झाली तर मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कठोर निर्णय घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. असं अजित पवार यांनी बोलून दाखवलं आहे.
तसेच, करोना संदर्भातील राज्य स्तरावरील निर्णय हे राज्य प्रमुख या नात्याने मुख्यमंत्रीच घेतात. त्याच्याबाबतची नियमावली मंत्री महोदयांनी जाहीर केलेली आहे. परंतु रूग्ण संख्या वाढत आहे, बहुतेक जण घरीच थांबून उपाचार घेत आहेत. त्याबाबत केंद्र सरकार व राज्य सरकारचा आरोग्य विभागही वेळोवेळी माहिती देत आहे. असं अजित पवार म्हणाले.