Sharad Pawar On Narendra Modi| पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका मुलाखतीदरम्यान शरद पवार यांच्यावर टीका केली होती. ‘कुटुंब सांभाळता आलं नाही ते महाराष्ट्र काय संभाळणार?’ अशी टीका नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्यावर केली होती. आता या टिकेला शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “मोदींनी कुठे कुटुंब सांभाळलं? मी त्यावर जाऊ इच्छित नाही. त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी चिंताजनक आहे. पण आपण व्यक्तीगत बोलणार नाही”, असं शरद पवार म्हणाले.
…म्हणून पंतप्रधान मोदींबद्दलची आस्था कमी होतेय Sharad Pawar On Narendra Modi|
“पंतप्रधान बेछूटपणे काही गोष्टी सांगत असतात. पण सरकारला ते करणं झेपेल की नाही? सरकारची तशी स्थिती आहे की नाही? याचा विचार ते करत नाहीत, म्हणून पंतप्रधान मोदींबद्दलची आस्था कमी होत आहे. डॉ. मनमोहन सिंग यांच्या धोरणांवर मोदींनी टीका-टिप्पणी केली होती. पण आज तेच निर्णय मोदी राबवत असल्याने त्यांचातला विरोधाभास लोकांना दिसत आहे.”
“लोक आता डॉ. मनमोहन सिंग यांची दहा वर्ष आणि मोदींच्या दहा वर्षांची तुलना करत आहेत. डॉ. मनमोहन सिंग यांचं वैशिष्ट होतं की, ते कोणताही गाजावाजा न करता शांतपणे काम करायचे आणि रिझल्ट द्यायचे. मोदी साहेबांचा रिझल्ट माहीत नाही, पण टीका-टिप्पणीतच त्यांचा फार वेळ जातो आणि लोकांच्या हे सर्व लक्षात येत आहे,” असेही शरद पवार म्हणाले. Sharad Pawar On Narendra Modi|
पंतप्रधान मोदी यांनी या मुलाखतीत उद्धव ठाकरेंवरही भाष्य केले होते. उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत. ते जेव्हा अडचणीत येतील, तेव्ही त्यांच्या मदतीसाठी धावणारा मी पहिला व्यक्ती असेन, असेही मोदी म्हणाले होते. यावर शरद पवारांनी “मोदींनी लाख काहीही म्हटलं तरी आमची प्रार्थना असेल की, उद्धव ठाकरेंना यांची मदत घेण्याची वेळ येऊ नये,” अशी मिश्किल प्रतिक्रिया दिली.
हेही वाचा: