नवी दिल्ली – करोना महासाथीच्या रोगाच्या तीन लाटा आल्या. आता हळूहळू ही महामारी कमी होत असल्याचे पहायला मिळत आहे. अशातच आता करोनाची तिसरी लाट कधी संपणार याविषयी तज्ज्ञांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
करोना संसर्गाची तिसरी लाट मार्चपर्यंत संपण्याची शक्यता, तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या एका अधिकाऱ्याच्या मते, देशातील काही भागांमध्ये या महिन्याच्या अखेरीस तिसरी लाट ओसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
करोनाची रुग्णसंख्या आता घटत चालली आहे. त्यामुळे आता निर्बंधामध्येही शिथिलता पहायला मिळणार आहे. अशातच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्य मास्कमुक्त होणार का? याविषयी महत्त्वाची माहिती दिली आहे.
दरम्यान, महाराष्ट्र आणि देशात मास्कमुक्ती केली पाहिजे असं अजिबात नाहीये. इतक्या मोठ्या लोकशाही असलेल्या देशात तात्काळ मास्कमुक्ती करुन संकट ओढवायचं नाहीये. त्यामुळे तुर्तास मास्कमुक्ती केली जाणार नाही, असं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.