नवी दिल्ली: नियंत्रण रेषेवरील परिस्थिती कधीही चिघळू शकते. त्यामुळे देशवासियांनी अधिक तणावाच्या स्थितीचा सामना करण्यासाठी तयार रहायला हवे, असे लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत यांनी म्हटले आहे.
ऑगस्टमध्ये 370 कलम रद्द केल्यापासून जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून युद्धविरामाचा वारंवार भंग झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर लष्करप्रमुखांनी ही टिप्पणी केली आहे.
ऑगस्ट 2019 ते ऑक्टोबर 2019 दरम्यान जम्मू-काश्मीरमधील सीमेवरील नियंत्रण रेषेवरील युद्धबंदी उल्लंघनाच्या एकूण 950 घटना नोंदल्या गेल्या आहेत, असे केंद्रीय गृह राज्यमंत्री जी किशन रेड्डी यांनी गेल्या महिन्यात लोकसभेत सांगितले होते,