पुणे – राज्यातील सन 2019-20 या शैक्षणिक वर्षातील इयत्ता नववी व अकरावीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना येत्या 7 ऑगस्टपर्यंत शाळेत बोलावून अथवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तोंडी परीक्षा घ्यावी. यातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्याबाबतचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे.
करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे खबरदारीचा उपाय म्हणून इयत्ता नववी व अकरावीच्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्या. अंतर्गत मूल्यमापनानुसार विद्यार्थ्यांचे निकाल लावण्याबाबतच्या सूचना होत्या. मात्र, तरीही काही विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण करण्यात आले होते.
नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांनाही दहावी, बारावीप्रमाणे पुन्हा संधी देण्याची बाब विचाराधीन होती. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.