Lok Sabha elections 2024| लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभादरम्यान राजकीय नेतेमंडळीचे आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या भाषणात तथ्यांच्या आधारावर बोलत नाहीत, असे विधान प्रियंका गांधी यांनी केले होते. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी प्रियंका गांधींच्या विधानावर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना खुले आव्हान दिले आहे.
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी प्रियांका गांधी यांच्या वक्तव्यावर प्रत्युत्तर देताना म्हटले आहे की, “मी त्यांना (प्रियांका गांधी वाड्रा आणि राहुल गांधी) चॅनेल, अँकर, स्थळ, वेळ आणि मुद्द्याचा वापर करून दोन्ही भाऊ आणि बहिणींना बोलवा. एका बाजूला ते आणि भाजपचे प्रवक्ते दुसऱ्या बाजूला असतील. त्यानंतर सर्व काही स्पष्ट होईल. आमच्या पक्षाचे सुधांशू त्रिवेदी त्यांच्यासाठी पुरेसे आहेत. त्यानंतर कोणामध्ये किती हिंमत आहे हे समजेल.” Lok Sabha elections 2024|
स्मृति ईरानी,
चुनौती देती हूँ आपको – मेरे साथ एक डिबेट कर लीजिए
जगह आपकी, दिन आपका, एंकर आपका और मुद्दा भी आपका
है हिम्मत? कांग्रेस के शीर्ष नेतृत्व से बात करने का तो आपका क़द नहीं
इन लच्छेदार बयानों के ज़रिये वजूद की लड़ाई लड़नी बंद कीजिए, चुनौती स्वीकारिये @smritiirani https://t.co/b9SmWpBYUx
— Supriya Shrinate (@SupriyaShrinate) May 8, 2024
काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांचे चर्चेचे आव्हान
स्मृती इराणी यांच्या या वक्तव्यावर काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी त्यांना चर्चेचे आव्हान दिले आहे. त्यांनी सोशल मीडियावर लिहिले की, “स्मृती इराणी, मी तुम्हाला आव्हान देतो, माझ्यासोबत डीबेट करा. जागा तुमची, दिवस तुमचा, अँकर तुमचा आणि मुद्दाही तुमचा आहे. तुमच्यात हिम्मत आहे का? काँग्रेसच्या सर्वोच्च नेतृत्वाशी बोलण्याची तुमची क्षमता नाही, या अशा वक्तव्यातून अस्तित्वाची लढाई थांबवा आणि आव्हान स्वीकारा.” Lok Sabha elections 2024|
प्रियंका गांधी काय म्हणाल्या होत्या?
“मोदी त्यांच्या भाषणांमध्ये कल्पनाशक्तीचा अधिक वापर करत असल्याचे जाणवते. वास्तव मुद्द्यांवर ते बोलत नाहीत. कॉंग्रेस सत्तेत आल्यास जनतेचे दागदागिनेच नव्हे, तर म्हशीही हिरावल्या जातील असे ते म्हणत आहेत. पंतप्रधानपदावर असणाऱ्या व्यक्तीव्यतिरिक्त इतर कुणी तसे बोलले असते तर आम्ही हसलो असतो. पण, पंतप्रधानच तसे म्हणत असल्याने आम्ही हसूही शकत नाही,” अशी मिश्कील टिप्पणी प्रियंका गांधी यांनी केली होती.
हेही वाचा:
“चंद्रकांत पाटलांनी शरद पवारांबाबत केलेले विधान चुकीचे”; अजित पवारांनी स्पष्टच सांगितले…