Ajit Pawar| बारामती लोकसभा मतदार संघात यंदा पवार विरुद्ध पवार अशी लढत होत आहे, महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महायुतीकडून सुनेत्रा पवार यांना लोकसभा रिंगणात उतरवण्यात आले आहे. प्रचारादरम्यान मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बारामतीमध्ये शरद पवार यांचा पराभव करण्याचे वक्तव्य केले होते. यावर आता अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. चंद्रकांत पाटील यांनी बारामतीमध्ये शरद पवार यांचा पराभव करण्याचे केलेले वक्तव्य चूकीच असल्याचे मत अजित पवार यांनी केले आहे.
काय म्हणाले अजित पवार? Ajit Pawar And Chandrakant Patil|
“चंद्रकांत पाटील यांनी बारामतीमध्ये शरद पवार यांचा पराभव करण्याचे केलेले वक्तव्य चूकीचे होते. हे मी कबूल करतो. त्या विधानाला काही अर्थ नव्हता, त्यामध्ये काही तथ्य नव्हते. शरद पवार बारामतीमध्ये निवडणुकीमध्ये उभे नव्हते तर साहेबांचा पराभव करण्याचा प्रश्नच येत नाही, पवार साहेब निवडणुकीला उभे असते तर वेगळी गोष्ट होती. त्यांनी ते बोलायला नको होतं, ते का बोलून गेले आम्हालाही माहिती नाही,” असे अजित पवार म्हणाले.
पुढे ते म्हणाले, “या निवडणुकीत पवार साहेब उभेच नव्हते त्यामुळे त्यांचा पराभव करण्याचा प्रश्नच येत नाही. सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार निवडणुकीत उभ्या होत्या.त्यामुळे त्यांच्या दोघींतील एकीचा होईल. मी चंद्रकांतदादांना म्हणालो तुम्ही पुण्यातच काम बघा. मी आणि आमचे कार्यकर्ते बारामतीच काम बघतो. त्यांनी यानंतर अवाक्षर देखील काढलं नाही.”
“मी फार जवळून शरद पवारांसोबत काम केले आहे. त्यांच्या कामाची पद्धत मला माहिती आहे. संभ्रमावस्था निर्माण करण्यासाठी शरद पवार अनेकदा विधाने करतात. शरद पवारांना ज्यावेळी निर्णय घ्यायचा असतो तेव्हा ते बाकीच्या सहकाऱ्यांना सांगतात आणि तो सामुहिक निर्णय आहे असं दाखवतात,” असेही अजित पवार म्हणाले. Ajit Pawar And Chandrakant Patil|
हेही वाचा:
नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस!! तब्बल 9 वर्षानंतर अभिनेत्री शिवानी सुर्वे करणार पुनरागमन