Lok Sabha Election 2024 । लोकसभा निवडणुकीनंतर देशातील बहुतेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील किंवा काँग्रेससोबत जातील, असे भाकित शरद पवार यांनी व्यक्त केल्यानंतर देशात पुन्हा एकदा विलीनीकरण या विषयावर चर्चा सुरू झाली आहे.
देशात सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीची अर्धी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शरद पवार यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये हे भाकित केले आहे. शरद पवार यांनी आजपर्यंत केलेली विविध वक्तव्य आणि त्याचे टाइमिंग लक्षात घेता या काँग्रेसमधील विलीनीकरणाबाबतच्या वक्तव्याचे टायमिंग आणि त्याचे महत्त्व यालाही निश्चितच काहीतरी अर्थ आहे. लोकसभा निवडणुकीनंतर विलीनीकरणाची ही प्रक्रिया सुरू होईल, असे संकेत त्यांनी दिले आहेत.
यावरून राज्यातील राजकारण तापले असून चर्चांना उधाण आले आहे. या चर्चांवर आता खुद्द शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार म्हणाले,’सरसकट पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार नाहीत, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं.
माध्यमांशी बोलतांना ते पुढे म्हणाले,’काँग्रेस पक्षाच्या विचाराच्या जवळ जाणारा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहेत. स्थापनेपासून आम्ही काम करत आहोत. अनेक वर्षांचा एकत्रित काम करण्याचा आमचा अनुभव आहे. त्यामुळे अधिक एकत्र येऊन काम करण्याची आमची भावना वाढली तर आश्चर्य वाटायला नको.’ असेही ते म्हणाले आहे.
हे वाचले का ?
“चंद्रकांत पाटलांनी शरद पवारांबाबत केलेले विधान चुकीचे”; अजित पवारांनी स्पष्टच सांगितले…