Lok Sabha Election 2024 । महाराष्ट्रातील अमरावती येथील भाजप खासदार नवनीत राणा यांच्या विधानावरून वाद वाढला आहे. एआयएमआयएमने थेट भाजपवर हल्लाबोल करत निवडणूक आयोगाकडे कारवाईची मागणी केली आहे. एआयएमआयएमचे प्रवक्ते वारिस पठाण म्हणाले की, निवडणुकीदरम्यान अशा विधानांमुळे दोन समुदायांमध्ये तणाव वाढू शकतो.
15 सेकंद लगेगा @AkbarOwaisi_MIM @asadowaisi pic.twitter.com/TfEmWhvArX
— Navnit Ravi Rana (Modi Ka Parivar) (@navneetravirana) May 8, 2024
अमरावतीचे खासदार नवनीत राणा बुधवारी भाजप उमेदवार माधवी लता यांच्या समर्थनार्थ प्रचारासाठी हैदराबादला पोहचल्या होत्या. यादरम्यानचा नवनीत राणांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये राणा म्हणाल्या,’पोलिसांना 15 मिनिटासाठी हटवा, मग आम्ही दाखवतो काय करु शकतो ते, छोट्याला माझं एवढच सांगणं आहे की, तुला 15 मिनिट लागतील, पण आम्हाला 15 सेकंद पुरेसे आहे. 15 सेकंदांसाठी पोलिसांना हटवलं, तर छोटा (अकबरुद्दीन ओवैसी) आणि मोठा (असदुद्दीन ओवैसी) यांना समजणारच नाही की, ते कुठून आले आणि कुठे गेले” असं राणा म्हणाल्या. राणा यांनी X हँडलवर व्हिडिओ पोस्ट केला आहे. यात अकबरुद्दीन ओवेसी आणि असदुद्दीन ओवेसी यांनाही टॅग करण्यात आले आहे.
एआयएमआयएमचे प्रवक्ते वारिस पठाण यांनी नवनीत यांच्या वक्तव्यावर जोरदार प्रतिउत्तर दिल आहे. वृत्तमाध्यमांशी बोलताना पठाण म्हणाले, ‘भाजप नेते निवडणुकीदरम्यान अशी विधाने करत आहे, जे निवडणूक आयोगाच्या नियमांचे उल्लंघन करतात. नवनीत राणा यांच्या या वक्तव्यावर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी. कारण अशी विधाने केल्याने दोन समाजात तेढ निर्माण होऊ शकते. एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी आणि भाजपच्या माधवी लता हे हैदराबाद लोकसभा मतदारसंघात आमनेसामने आहेत.
वारिस पठाण म्हणाले, नवनीत राणासारखे भाषण वारिस पठाण यांनी केले असते तर आज ते तुरुंगात गेले असते. अकबरुद्दीन ओवेसीच्या वक्तव्यावर वारिस पठाण म्हणाले की, त्यांनी १५ मिनिटांसाठी पोलिसांना हटवण्याचे वक्तव्य केले होते, त्यानंतर त्यांनी स्वतः आत्मसमर्पण केले आणि ४० ते ४२ दिवस तुरुंगात राहिले. नंतर त्यांना जामीन मिळाला, पण त्यांनी दहा वर्षे कोर्टात आपले म्हणणे मांडले आणि त्याची निर्दोष सुटका झाली.
वारिस यांनी निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित करत विचारले,’नवनीत राणा यांच्यावर निवडणूक आयोग कधी कारवाई करणार आणि त्यांना तुरुंगात कधी पाठवणार? दररोज मुस्लिमांविरोधात अशी वक्तव्ये केली जातात आणि भाजप नेत्यांना मुस्लिमांविरोधात वक्तव्य करण्यात मजा येते. मात्र कोणावरही कारवाई होत नाही. वारिस पठाण म्हणाले, राज्यघटनेने सर्वांना समान अधिकार दिले आहेत, मग हे सर्वांचे अधिकार आहेत का?’ असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
हे वाचले का ? नवनीत राणांच्या ’15 सेकंद’ वक्तव्यावर ओवेसी म्हणाले,’एक तास घ्या अन्…’