नगर -राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या अभिप्राय अभियानास गती देण्यात आल्याची माहिती पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी पत्रकारांना दिली. राष्ट्रवादी कॉंग्रेस तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोचण्यासाठी तसेच त्यांची मते व सूचना जाणून घेण्यासाठी पक्षातर्फे “राष्ट्रवादी पक्ष अभिप्राय अभियान’ राबविण्यात येत आहे.
पक्षाच्या 21 व्या वर्धापनदिन निमित्त 22 मे रोजी “राष्ट्रवादी पक्ष अभिप्राय’ अभियानास प्रारंभ झाला. आत्तापर्यंत विविध माध्यमातून 5 लाखाहून अधिक लोकांपर्यंत पोहोचलो आहोत. मोहिमेच्या शेवटच्या टप्प्यात जिल्हास्तरावरील पक्षाचे सर्व कार्यकर्ते, बुथ कमिटीचे कार्यकर्ते व अन्य पदाधिकारी पक्षाच्या उन्नतीसाठी आपल्या सूचना देतील. सर्वसामान्य कार्यकर्त्यांपर्यंत पोचण्यासाठी मोठ्या पातळीवर मोहिम हाती घेणारा राष्ट्रवादी कॉंग्रेस हा एकमेव पक्ष आहे. करोनाच्या उद्रेकातील कठीण काळात पक्षाची तत्त्वे पाळणे व लोकांना मदत करणे, यावर लक्ष केंद्रित करायचे आहे. तालुक्याध्यक्षांचा पक्षातर्फे ज्येष्ठ नेत्यांच्या हस्ते गौरव करण्यात येणार असल्याचे फाळके यांनीं सांगितले.