Narayan Rane On Sharad Pawar| पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणादरम्यान शरद पवारांचे नाव न घेता त्यांना भटकती आत्मा म्हटले होते. मोदींच्या या वक्तव्यानंतर विरोधकांकडून मोदींवर टीका करण्यात आली होती. त्यानंतर आता नारायण राणेंनी शरद पवार यांच्यावर जहरी टीका केली आहे. शरद पवार आयुष्यात एखाद्या विषयासाठी अस्वस्थ झाले असते तर 84 वर्षे जगले नसते, असे विधान नारायण राणे यांनी केले आहे.
नेमकं काय म्हणाले नारायण राणे? Narayan Rane On Sharad Pawar|
“आता शरद पवारांचे वय 84 आहे. ते चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, 12 वर्ष केंद्रीय मंत्री, दोन वर्ष संरक्षण मंत्री राहून काही करू शकले नाहीत. शरद पवार आयुष्यात एखाद्या विषयासाठी अस्वस्थ झाले असते तर 84 वर्षे जगले नसते. 84 वर्षाच्या वयात शरद पवार विकास कामासाठी कधी अस्वस्थ झाले नाही,” असे नारायण राणे म्हणाले.
पुढे ते म्हणाले, “माणसाला आजकाल हवामान बदल झाला की 50-55 वर्षात अटॅक येतो, माणसे जातात. 84 वर्षात जग इकडचं तिकडे होत पण शरद पवारांना काही होत नाही, बिनधास्त असतात. मोदींना सांगतात तुमचं सरकार गेल्याशिवाय माझी अस्वस्थता जाणार नाही, मात्र आमचं सरकार जाणार नाही. तर 400 पेक्षा जास्त खासदार येऊन मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहे,” असा विश्वासही नारायण राणे यांनी व्यक्त केला.
“शरद पवारांना एकच सांगणे आहे की, चांगल्याला चांगले म्हणणे हा माणुसकीचा धर्म आहे, तो विरोधक असला तरी त्यामुळे शरद पवार साहेब चांगल्याला चांगलं म्हणा हा माणुसकीचा धर्म आहे. मोदी आणि पवार चांगले मित्र आहेत म्हणता, मग मित्राला चांगलं बोलता येत नसेल तर वाईट तरी बोलू नका,” असेही नारायण राणे यांनी शरद पवार यांना म्हंटले आहे.
मोदींच्या टीकेला शरद पवार यांनी दिले होते प्रत्युत्तर Narayan Rane On Sharad Pawar|
“हो माझा आत्मा भटकत आहे, अस्वस्थ आहे, पण तो स्वत:च्या स्वार्थासाठी अस्वस्थ नाही, तर लोकांच्या दु:खासाठी अस्वस्थ आहे, देशातील लोक महागाईने त्रस्त आहेत, शेतकऱ्यांचे दु:ख पाहून आत्मा अस्वस्थ होत असेल तर त्यात गैर काय?” असा सवाल शरद पवार यांनी केला होता. दरम्यान, यावरूनच नारायण राणे यांनी शरद पवार यांच्यावर पुन्हा निशाणा साधला.
हेही वाचा :
‘जाहीर माफी मागतो..आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही शेण खाताय’ उद्धव ठाकरेंनी मागितली माफी