नगर -केवळ पन्नास लोकांच्या उपस्थित लग्न सोहळा करण्याच्या प्रशासनाच्या आदेशाला मंगल कार्यालयाकडून हरताळ फासली जात आहे.
मंगल कार्यालयात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवत गर्दी होताना दिसत आहे. करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता मंगल कार्यालयावर प्रशासनाने करडी नजर ठेवण्याची गरज व्यक्त होत आहे. मात्र, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
जिल्ह्यात दिवसेंदिवस करोना रूग्णाची संख्या वाढत आहे. मात्र, वधु व वरांकडील माणसे स्वतःची प्रतिष्ठा जपण्यासाठी लग्न सोहळ्यासाठी नातेवाईक मित्र परीवार यांना निमंत्रण देऊन मंगल कार्यालयात गर्दी करताना करत आहेत. या गर्दीमधूनच आपल्या घरात करोना येवू शकतो याचा विसरच नागरिकांना पडला आहे.शासनाने करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी पन्नास नागरिकांच्या उपास्थित लग्न सोहळा करण्यास मंगल कार्यालयाला परवानगी दिली.
परवानगी देतांना प्रत्येकाला मास्क व सॉनिटायझर वापर करावा तसेच येणाऱ्यांची प्रत्येक नागरिकांची नोंद घ्यावी. मात्र, मंगल कार्यालयाकडून कुठल्याच अटींची पूर्तता होताना दिसत नसून सोशल डिस्टन्स्टिंगचा फज्जाच उडविला आहे.अशा या शहरी व ग्रामीण भागातील मंगल कार्यालयावर प्रशासनाने करडी नजर ठेवावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.