कोलकाता – अन्न पुरवठा करणाऱ्या उद्योग व्यवसायांना अन्न दर्जा नियंत्रकाकडे नोंदणी करावी लागते. सध्याची परिस्थिती पाहता ही नोंदणी एक वर्ष स्थगित करावी, अशी मागणी या क्षेत्रातून होत आहे.
या उद्योगासमोरील अडचणी ध्यानात घेऊन अगोदरच फूड सेफ्टी अँड स्टॅंडर्ड ऍथोरिटी ऑफ इंडिया म्हणजे एफएसएसएआय या अन्नसुरक्षा नियंत्रकांनी अन्नपुरवठा क्षेत्रातील व्यावसायिकांना नोंदणीसाठी मुदत वाढवून 31 जुलै केली आहे. ही मुदत लवकरच संपत असताना ऑल इंडिया व्यापार मंडळाचे सरचिटणीस व्ही. के. बन्सल यांनी सांगितले की, अर्धा भारत आणखीही लॉकडाऊनखाली आहे.
त्यामुळे परवाना नूतनीकरणासाठीची दिली गेलेली मुदत पाळता येईल की नाही याबाबत अनेक व्यावसायिकांना शंका आहे. त्याचबरोबर या वर्षातील तीन-चार महिने वाया गेले आहेत. त्यामुळे पूर्ण वर्षाच्या परवाना नूतनीकरणाची गरज काय, असे विचारले जात आहे.